MFOI 2024 Road Show
  1. बातम्या

केळी पिकाच्या नुकसान भरपाईपोटी जळगावमधील शेतकऱ्यांना 15 कोटी

मुंबई: गेल्या वर्षी जून 2018 मध्ये वादळी वारा व अवेळी पावसामुळे जळगाव जिल्ह्यातील केळी पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीपोटी केळी उत्पादक शेतकऱ्यांना 15 कोटी 82 लाख रुपयांची मदत देण्यास मान्यता दिली आहे. ही रक्कम तातडीने जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग करण्याचे निर्देश मदत व पुनर्वसनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिले.

KJ Staff
KJ Staff


मुंबई:
गेल्या वर्षी जून 2018 मध्ये वादळी वारा व अवेळी पावसामुळे जळगाव जिल्ह्यातील केळी पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीपोटी केळी उत्पादक शेतकऱ्यांना 15 कोटी 82 लाख रुपयांची मदत देण्यास मान्यता दिली आहे. ही रक्कम तातडीने जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग करण्याचे निर्देश मदत व पुनर्वसनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिले.

गेल्या वर्षी 1 जून ते 21 जून 2018 या कालावधीत जळगाव जिल्ह्यात वादळी वारा व अवेळी पाऊस झाला होता. त्यामुळे जिल्ह्यातील केळी पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसान भरपाईपोटी शेतकऱ्यांना 15 कोटी 82 लाख 53 हजार रुपयांचा निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. जिल्ह्यातील सुमारे 8,013 शेतकऱ्यांना ही रक्कम  मिळणार आहे. शेतकऱ्यांना ही रक्कम तातडीने देण्यात येणार असल्याचेही श्री. पाटील यांनी सांगितले.

English Summary: 15 Crore to compensate for the banana crop in farmers of Jalgaon District Published on: 04 June 2019, 07:37 IST

Like this article?

Hey! I am KJ Staff. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters