1. कृषीपीडिया

हे वाचाच:शेतकऱ्यांनी कुठल्या महिन्यात कुठले पीक घ्यावे?महत्वाची माहिती

शेती करत असताना शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची पिकेघेतली जातात. तसे पाहायला गेले तर त्यांचा कालावधी हा वेगवेगळा असतो. काही पिकाची लागवड खरीप हंगामात केली जाते तर काहींची रब्बी हंगामात केली जाते. परंतु पिकाची लागवड करताना कोणत्या पिकाला बाजारपेठ कोणत्या वेळेस चांगला भाव असतो, त्याचा अभ्यास करून जर पिकांची लागवड केली तर बाजारपेठेत चांगला भावाचा फायदा मिळू शकतो. या लेखामध्ये आपण अशाच काही पिकांची लागवड केव्हा करावी याबद्दल माहिती घेणार आहोत.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
the maze crop

the maze crop

शेती करत असताना शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची पिकेघेतली जातात. तसे पाहायला गेले तर त्यांचा कालावधी हा वेगवेगळा असतो. काही पिकाची लागवड खरीप हंगामात केली जाते तर काहींची रब्बी हंगामात केली जाते. परंतु पिकाची लागवड करताना कोणत्या पिकाला बाजारपेठ कोणत्या वेळेस चांगला भाव असतो, त्याचा अभ्यास करून जर पिकांची लागवड केली तरबाजारपेठेत चांगला भावाचा फायदा मिळू शकतो. या लेखामध्ये आपण अशाच काही पिकांची लागवड केव्हा करावी याबद्दल माहिती घेणार आहोत.

पिकांचा लागवड कालावधी

  • दरवर्षी 15 नोव्हेंबर ते 15 जानेवारी व जूनच्या पहिल्या आठवड्यात काकडी लावावी. म्हणजे जुलै-ऑगस्टमध्ये आणिएनथंडीत काकडी चे पैसे हमखास होतात.
  • महाशिवरात्रीस कांद्याचे रोप टाकून कांद्याची पात गुढीपाडव्याच्या लावावे. म्हणजे उन्हाळ्यात व आषाढी एकादशी पर्यंत पातीचे पैसे होतात.
  • 17 मार्च ते 19 मे हल्लीच्या बदलत्या पावसाच्या हवामानात मृग आणि आद्रा कोरडे जाते, तेव्हा 7 जून पर्यंत दर 8 दिवसांनी पाण्याची उपलब्धता असेल तर 5 ते 10 गुंठे चे कोथिंबिरीचे प्लॉट करावेत. म्हणजे उन्हाळ्यात कोथिंबीरीचे पैसे होतात.
  • जून-जुलैमध्ये झेंडूचे बी टाकून रोपे तयार करावे.म्हणजे हमखास झेंडूचे दसरा-दिवाळी पैसे होतात.
  • ऑगस्ट महिन्यामध्ये गेल्या वर्षी एप्रिल मे महिन्यात केलेल्या आल्याच्या लागवडी वर्षभर जैविक औषधे सेंद्रिय खते वापरून आले गणपती पासून काढण्यास सुरुवात करावी, म्हणजे आल्याचे पैसे हमखास होतात.
  • सप्टेंबर मध्ये हस्त बहार धरून लिंबाला भाव मिळून पैसे होतात.
  • द्राक्षांची एप्रिल आक्टोंबर छाटणी लवकर घेऊन रमजान व नाताळाला द्राक्ष आखाती राष्ट्र व युरोप राष्ट्रात निर्यात करता येतात. तसेच महिनाभर अगोदर द्राक्ष काढल्यामुळे पाणी, मजुरी, खत, औषधे यांच्यात बचत होते.
  • रमजाननाताळ व इतर सणासाठी कलिंगड व खरबूज याची लागवड सलग किंवा आंतरपीक ( डाळिंबात किंवा शेवग्यात ) घेतले तर रमजान किंवा नाताळाला देशांतर्गत मार्केटमध्ये निर्यातीस उपलब्ध होतात. हा अनुभव बऱ्याच शेतकऱ्यांनी घेतला आहे.
  • गणपती झाल्यावर पितृपंधरावड्यामध्ये विविध प्रकारचे भाजी यावी. यासाठी नियोजन करून उत्पन्न घेतल्यास शेतकऱ्यांना अल्पावधीत कमी लागवडीत पैसे मिळवता येतात. सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात थंडी सुरू होण्यापूर्वी भेंडी वीतभर आपल्या तंत्रज्ञानानेउगवूनऐनथंडीत भेंडीचे हमखास पैसे होतात.
  • नवरात्री च्या अगोदर बाजरी, हळवा कांदा अथवा उडीत काढल्यावर गहू करताना गव्हाची लागवड जर्मिनेटर लावून एकोणावीस नोव्हेंबरच्या आत करावी. व गव्हास लागवडीपासून दर 21 दिवसांनी जसे पाणी उपलब्ध असेल तशा पाळ्या द्याव्यात. परंतु पाळ्या कधीही चुकवू नये.42 व्या दिवशीचे पाणी उपलब्ध नसल्यास 63 व्या दिवशी द्यावे. 63 व्या दिवशी नसेल तेव्हा 84 व्या दिवशी द्यावे आणि 105 व्या दिवशी हमखास पाणी द्यावे. म्हणजे गव्हात चीक  भरतेवेळी हमखास पाणी द्यावे.
  • पाण्याची कमतरता असल्यास डाळिंबाचा मृग बहार धरावा आणि या बहाराची फळे द्राक्ष व आंबा मार्केटला येण्यापूर्वी ( 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी  ) आणावीत. द्राक्षे शक्यतो लवकर सुरू करून नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये मार्केटला आणून 1जानेवारी ते 15 मार्च पर्यंत संपवून टाकावीत. कुठल्याही परिस्थितीत द्राक्ष डाळिंब हे आंब्याच्या काळात येणार नाहीत हे पहावे.
  • स्ट्रॉबेरी देशभर या विज्ञानाने कुठेही येऊ शकते,तीनाताळाला मार्केटमध्ये येईल, हे पहावे तसेच ती फेब्रुवारीपर्यंत चालावी व एप्रिलमध्ये कमी होऊन मेमध्ये जास्त यावी, हे पहावे. म्हणजेच मे चे  भाव सापडतात.
  • सीताफळ गौरी-गणपती यावीत यासाठी  मार्गशीष महिन्यात सिताफळ आस खांदणी  करून सेंद्रिय खत द्यावे व पाणी सोडावे. म्हणजे उन्हाळ्यात फुलगळ होत नाही. पावसाळ्यात सीताफळे काळी पडत नाही.डोळे मोठे होतात व दसरा-दिवाळीच्या मंदित फळे सापडत नाहीत.
  • अंधेरी चा बहार खट्टा असो वा मिठा, तो खट्ट्याबहाराच्या फळांना सुद्धा गोडी येऊन बहार चांगला येऊन हमखास पैसे होतात मिठा बहाराची फळे फेब्रुवारी ते मार्चच्या पहिल्या आठवड्यात मिळून चांगला दर मिळतो.शिवाय पाण्याच्या दुर्भिक्षामुळे बाग ना तुटता पाणी, खत व मेहनती मध्ये बचत होते.
  • हळवी कांदा किंवा रांगडा कांदा मार्केटला भाव सापडतात. 15 ऑक्‍टोबर ते 15 नोव्हेंबर ला फुरसुंगी हा गेल्या वर्षीचासाठवणीतला कांदा मार्केटला आणला तर दक्षिण भारतातील आंध्र, कर्नाटक, केरळ या राज्यातील मोठ्या शहरात म्हणजेच बेंगलोर, चेन्नई, तिरुअनंतपुरम, कोईमतुर अशा शहरात कांद्याचे भाव चढते असून हमखास पैसे होतात.
  • आंबा एप्रिल च्या अगोदर मार्केटला आणला तर पैसे हमखास होतातच परंतु मे महिन्यात अति उष्णतेने जोसाका होतो तो हमखास टाळता येतो.
  • मिरचीची लागवड अशी करावी की उन्हाळ्यात मार्केट मध्ये येईल या पद्धतीने या तंत्रज्ञानाने करावी. म्हणजे या काळात पैसे होतात. हा देशभरातील शेतकऱ्यांचा अनुभव आहे.
  • केळीची लागवड मृगातील असो अथवा कांदेबागातील असो ती एरवी 15 ते 18 महिन्यात येते.टिशू कल्चर ने बारा महिन्यात येते. एप्रिल मे ते जुलै ऑगस्ट आल्याने शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची निश्चितच पैसे मिळतात.
  • टोमॅटोची लागवड मार्च ते जून डिसेंबर मध्ये पहिला पंधरवड्यात करावी म्हणजे भाव सापडतात.
  • काटेरी भरताची व अंगोरा वांग्याला  भाव असतो. परंतु पावसाळ्यामध्ये शेंडे अळीचा प्रादुर्भाव होत असल्याने लागवड करू नये. तेहते वांगी दसऱ्यानंतर करावीत वांग्याला चांगला भाव मिळतो.
  • कोबीचे फेब्रुवारी ते उन्हाळ्यात चांगले पैसे होतात. त्यासाठी दोन महिने अगोदर रोपे लावून लागवड करावी. कोबीचा गड्डा हिरवागार नारळी आकाराचा लांबट गोल एका चौकोनी कुटुंबास पुरेसा होतो. हा गड्डा वजनदार असतो.. कोबी फेब्रुवारीत काढण्यासाठी दिवाळीत लागवड करावी.
  • फ्लावर ला ऑगस्ट फेब्रुवारी आणि उन्हाळ्यामध्ये मागणी असते. फ्लॉवरचा गड्डा पांढराशुभ्र घट्ट आणि आकार आंब्याच्या झाडाच्या चित्रासारखा गोलसर असावा. वजन 350 ते 600 ग्रॅम असावे अशा गड्यांना भाव जादा मिळतो.
  • मार्केटला मंदीची लाट जूनला एडमिशन असतात त्यामुळे मंदीची लाट असते. नंतर गणपती ते दिवाळी ही लाट ओसरते. कारण त्यावेळेस लोकांचे बोनस व आलेल्या शेती मालाचे पैसे मार्केटमध्ये राहतात. दिवाळीनंतर परत मंदीची लाट डिसेंबर मध्ये येते ती टॅक्स भरणे, बँकेचे हप्ते भरणे अशा विविध व्यवहारी बाबींमुळे मे पर्यंत टिकून राहते व त्यामुळे मार्केटमध्ये पैशाची उलाढाल कमी होते.
  • आठमाही बागायती पाणी साधारण जानेवारी फेब्रुवारी मध्ये संपते.या काळात भाजीपाला व फळ पिकांमध्ये प्रत्यक्षामध्ये तेजी असावयास हवी, तथापि नाही म्हटले तरी मागणीपेक्षा पुरवठा जास्त असा भाजीपाला पारंपारिक पद्धतीने केल्यामुळे व सर्वसाधारण माणसाची क्रियाशक्ती कमी असल्याने पैसे होते नाही ही वस्तुस्थिती आहे. यावर मात करण्यासाठी सेंद्रिय भाजीपाला  केले तर ती देशांतर्गत शहरी व निमशहरीमार्केटमध्ये यासाठी प्रचंड वाव आहे. कारण पारंपारिक पद्धतीने पिकवलेल्या शेतीमालापेक्षा नैसर्गिक शेतीमालास देशात दुप्पट तर परदेशात 4ते 5 पट भाव मिळू शकतो.नैसर्गिक भाजीपाला पिकवण्यासाठी देशी बियाण्यांचा व रोपाचा वापर झाल्यास तो एक दुग्धशर्करा योग्य ठरेल ( संदर्भ-कृषिवर्ल्ड )
English Summary: the proper duration of some crop cultivation is get benifit to farmer Published on: 23 February 2022, 05:05 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters