
भारतामध्ये शेती ही केवळ एक व्यवसाय नाही, तर एक परंपरा आहे. आपली अर्थव्यवस्था कृषीप्रधान आहे, कारण देशातील सुमारे ६०% लोक थेट किंवा अप्रत्यक्षपणे शेतीशी जोडलेले आहेत. हरित क्रांतीनंतर रासायनिक खते, कीटकनाशके आणि हायब्रीड बियाण्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आणि उत्पादनात लक्षणीय वाढ झाली. मात्र यासोबत अनेक दुष्परिणाम देखील झाले. जमिनीची सुपीकता कमी होत आहे, जलस्रोत दूषित होत आहेत आणि पिकांची गुणवत्ता प्रभावित होत आहे. परिणामी, शेतीचा खर्च वाढतोय पण शेतकऱ्यांना अपेक्षित नफा मिळत नाही. शिवाय रासायनिक पद्धतीने उत्पादित अन्नधान्य आणि भाजीपाला खाल्ल्यामुळे आरोग्यावरही परिणाम होत आहे.
या सर्व समस्यांना उत्तर म्हणून सेंद्रिय आणि नैसर्गिक शेती एक उत्तम उपाय ठरू शकते. सेंद्रिय शेती पर्यावरणाला हानी पोहोचवत नाही, तर जमिनीची सुपीकता टिकवून ठेवते आणि शेतकऱ्यांना स्थिर उत्पन्न देखील देऊ शकते. मात्र पारंपरिक रासायनिक शेतीतून सेंद्रिय शेतीकडे वळणं हे सहज शक्य नसतं. या प्रवासात शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे योग्य दिशादर्शन आणि मदतीची आवश्यकता आहे.
रासायनिक शेतीमधून सेंद्रिय शेतीकडे संक्रमण करताना येणारी प्रमुख आव्हाने
सेंद्रिय खतांची कमतरता – चांगल्या प्रतीची सेंद्रिय खते वेळेवर उपलब्ध होत नाहीत.
रासायनिक खतांवर अवलंबित्व – लगेच परिणाम देणाऱ्या रासायनिक खतांमुळे शेतकरी त्यावर सवयीचे झाले आहेत, तर सेंद्रिय खतांचा परिणाम हळूहळू दिसतो.
जमिनीची सुपीकता – रासायनिक शेतीमुळे जमिनीतील पोषणतत्त्व कमी होतात, परिणामी सेंद्रिय शेतीसाठी वेळ लागतो.
कीड व्यवस्थापन – जैविक उपाय आणि तांत्रिक ज्ञानाची कमतरता ही मोठी समस्या आहे.
पाण्याची टंचाई – पावसाचा अनियमितपणा आणि भूजल पातळीतील घट सेंद्रिय शेतीस अडथळा ठरतो.

Zytonic तंत्रज्ञान – सेंद्रिय शेतीत क्रांती
शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती सोप्या पद्धतीने करता यावी यासाठी संशोधनाधारित Zytonic तंत्रज्ञान झायडेक्स कंपनीने विकसित केले आहे. हे तंत्रज्ञान शाश्वत आणि नफ्याची शेती सुलभ करतं. Zytonic जमिनीची सुपीकता वाढवतं आणि सेंद्रिय शेतीसाठी आवश्यक पोषकतत्त्व सहज उपलब्ध करून देतं.
हे तंत्रज्ञान रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी करतं आणि उत्पादन खर्चात घट करतं. या तंत्रज्ञानाचा वापर केल्याने २ लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी ५०% ते १००% पर्यंत रासायनिक खतांचा वापर कमी केला आहे आणि उत्पादन व जमिनीच्या आरोग्यात लक्षणीय सुधारणा केली आहे.
Zytonic तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आव्हानांवर उपाय
सेंद्रिय खतांची उपलब्धता:
Zytonic Godhan या जैविक तंत्रज्ञानामुळे शेणखत ८–१० महिन्यांऐवजी ४५–६० दिवसांत तयार होतं.
गुरुजन्त सिंग, उत्तराखंड:
“मी १०० एकर शेतात ऊस, भात, गहू यांची शेती करतो. सुरुवातीला २ एकरपासून सेंद्रिय शेती सुरु केली, आता ३५ एकरवर ५०:५० प्रमाणात सेंद्रिय आणि रासायनिक शेती करतो. Zytonic Godhan वापरून शेणखत ४०–६० दिवसांत तयार होतं, आणि केवळ १० क्विंटल/एकर खत वापरून चांगले उत्पादन मिळतं.”
रासायनिक खतांवर अवलंबित्व:
Zytonic-M जमिनीत सेंद्रिय कार्बन वाढवतो आणि उत्पादन वाढवतो.
विवेक शर्मा, उत्तर प्रदेश:
“मी गेल्या ३ वर्षांपासून केवळ Zytonic कंपनीचे सेंद्रिय उत्पादने वापरून १००% सेंद्रिय शेती करतो. जमीन सुपीक झाली आहे, उत्पादन वाढलं आहे आणि खर्च कमी झाला आहे.”
जमिनीचं आरोग्य:
Zytonic मुळे माती मऊ, सच्छिद्र व पोषणक्षम होते.
राजाराम प्रजापती, उत्तर प्रदेश:
“मी माझ्या ५ एकरात भाजीपाला, गहू, बटाटा इ. पीक घेतो. Zytonic-M वापरल्याने जमिनीत मऊपणा व हवेशीरपणा वाढतो, आणि बियाण्यांची उगमक्षमता चांगली होते.”

कीटक नियंत्रण:
Zytonic Neem फवारणीमुळे कीटक नियंत्रण होते, उत्पादनावर डाग लागत नाहीत.
कृष्णकुमार वर्मा, बाराबंकी:
“मी केळी पीक घेतो. Zytonic Neem वापरल्याने बिटलचा प्रादुर्भाव कमी होतो. याशिवाय झायटॉनिकचे इतर उत्पादन झाडांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.”
पाणी उपलब्धता:
Zytonic वापरल्याने मातीमध्ये पाण्याची धरून ठेवण्याची क्षमता वाढते. त्यामुळे सिंचनाची गरज कमी होते.
दोस्त मोहम्मद, बलरामपूर:
“आधी ५ ट्रॉली शेणखत लागायचं, आता Zytonic Godhan वापरल्यावर फक्त १ ट्रॉली लागते. सध्या ६०% रासायनिक, ४०% सेंद्रिय वापर करतो. जमिनीचा ओलावा टिकतो आणि पीक वेळेवर पाणी न दिल्यास सुद्धा खराब होत नाही.”
Zytonic तंत्रज्ञानाने केवळ शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले नाहीत, तर त्यांना सेंद्रिय शेतीकडे वळण्यासाठी प्रेरित केले आहे. पर्यावरणस्नेही, किफायतशीर, आणि टिकाऊ शेतीचा मार्ग देणारे हे तंत्रज्ञान भारताच्या कृषी क्षेत्रासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरू शकते.
Share your comments