1. कृषी व्यवसाय

जाणुन घ्या द्राक्षेपासून मनुका बनवण्याची प्रोसेस. तुम्हीही घेऊ शकता चांगलं उत्पन्न

द्राक्षांवर इथाईल ऑलिएट आणि पोटॅशियम कार्बोनेटची फवारणी केल्याने 12-14 दिवसात द्राक्षांपासून 16 टक्के ओलावा दूर होतो आणि त्यांचे रूपांतर मनुकामध्ये होण्यास सुरवात होते. म्हणजेच, 12-14 दिवसात तुम्ही द्राक्षेपासुन मनुका बनवून विकू शकता.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
plum

plum

द्राक्षांवर इथाईल ऑलिएट आणि पोटॅशियम कार्बोनेटची फवारणी केल्याने 12-14 दिवसात द्राक्षांपासून 16 टक्के ओलावा दूर होतो आणि त्यांचे रूपांतर मनुकामध्ये होण्यास सुरवात होते. म्हणजेच, 12-14 दिवसात तुम्ही द्राक्षेपासुन मनुका बनवून विकू शकता.

फळांची शेती असो किंवा फुलांची शेती असो, कोरोनामुळे प्रत्येकाचे नुकसान झाले आहे.  कोरोनामुळे निर्यात आणि प्रचंड नफ्याची भावना जोपासणाऱ्यांचे खूप नुकसान झाले आहे. जर कोरोनाने कोणत्या शेतीचा सर्वाधिक नाश केला असेल तर ती द्राक्ष शेती आहे.  देशातील शेतकरी निर्यातीसाठी अनेकदा काळ्या द्राक्षांची लागवड करतात. यावेळीही केले, पण कोरोनाने सर्व दरवाजे बंद केले.  द्राक्षे शेतातून बाहेर आली पण बाजारात पोहोचलीच नाही. ते येताच, ते फेकलेल्या किंमतीत विकले गेले.

 पण जर द्राक्षे अशा स्वस्त दरात विकले जात असतील तर आपण मनुके बनवून मार्केट मध्ये 250-300  रुपये पर्यंत विकु शकता. द्राक्षे मनुक्यामध्ये बदलण्यासाठी हवामान अनुकूल असेल तर 12-15 दिवसात द्राक्षे मनुकामध्ये बदलली जाऊ शकतात. तथापि, अनुकूल हवामानासह, एक विशेष पद्धत स्वीकारली जाते, ज्याला ड्राय-ऑन-वाइन पद्धत म्हणतात. या पद्धतीमुळे कोणताही शेतकरी ताज्या द्राक्षांचे मनुकामध्ये रूपांतर करू शकतो.

जाणुन घ्या द्राक्षे मनुक्यात रूपांतर करण्याची पद्धत

द्राक्षांपासून मनुका बनवण्यासाठी एक लिटर पाण्यात 15 मि.ली. इथाइल ऑलिएट आणि 25 ग्रॅम पोटॅशियम कार्बोनेट मिसळले जाते. हे पाणी द्राक्षांच्या घडावर फवारले जाते. जर एक एकर शेतात द्राक्षांची लागवड केली असेल तर 150 लिटर पाण्यात 2.25 लिटर इथाईल ऑलिएट आणि 3.75 किलो पोटॅशियम कार्बोनेट यांचे मिश्रण तयार केले जाते, आणि फवारणी करा. दोन-तीन दिवसानंतर हे द्रावणची पुन्हा फवारणी करा.

 परंतु जर तुम्ही दुसऱ्यांदा फवारणी केली तर पाण्यात कमी रसायन घाला. उदाहरणार्थ, 1.65 लिटर इथाईल ऑलिएट आणि 2.70 किलो पोटॅशियम कार्बोनेट 150 लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करा आणि द्राक्षे घडावर फवारणी करा.

 

द्राक्षांवर एथिएल ऑलिएट आणि पोटॅशियम कार्बोनेटची फवारणी केल्याने 12-14 दिवसात द्राक्षांपासून 16 टक्के ओलावा दूर होतो आणि ते मनुक्यात बदलतात. म्हणजेच, 12-14 दिवसात तुम्ही द्राक्षे काढून मनुका म्हणून विकू शकता. त्याचा दर 250-300 रुपये प्रति किलो पर्यंत असू शकतो. जर तुम्ही मनुका न बनवता द्राक्षे विकलीत तर तुम्हाला तुमचे अर्धे उत्पन्नही मिळणार नाही. चांगले द्राक्षे बाजारात 100-150 किलो किरकोळ बाजारात उपलब्ध आहेत. याचा अर्थ असा की व्यापाऱ्यांना खूप कमी दराने विकले जात असतील. मनुकाच्या बाबतीत असे नाही, किंमती कमी होतात पण इतक्या वेगाने 

 

द्राक्षे उत्पादनात महाराष्ट्रात अग्रेसर

कोरोनामुळे, ज्या शेतकऱ्यांची द्राक्षे चांगल्या किमतीत विकली नाहीत, ते आता मनुका विकून चांगला नफा कमवत आहेत.  द्राक्षांपासून मनुका बनवण्याचे काम त्यांच्या हातात असल्याने शेतकरी त्याचा पुरेपूर फायदा घेत आहेत. यावेळी कोरोनाचा सर्वाधिक कहर महाराष्ट्रात दिसून आला, ज्याचा परिणाम द्राक्ष आणि मनुका बाजारावरही झाला आहे.  देशातील 81 टक्के द्राक्षांचे उत्पादन महाराष्ट्रात होते. महाराष्ट्रातील लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आता त्यांना त्याची भरपाई मनुका तयार करून करायची आहे.  शेतकऱ्यांनी पॅकेजिंगचे काम जवळपास पूर्ण केले आहे.बाजार हळूहळू उघडत आहेत, ज्यामुळे त्यांना मनुका व्यवसायात फायदा होऊ शकतो.

 

English Summary: process of making of plum from grape Published on: 10 September 2021, 09:50 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters