Weather

मागच्या काही दिवसात पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र आता मागच्या दोन-तीन दिवसात पावसाने धुमाकूळ घातला आहे. राज्यात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. राज्यातील विविध भागात पाऊस कोसळत आहे.

Updated on 09 October, 2022 12:42 PM IST

मागच्या काही दिवसात पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र आता मागच्या दोन-तीन दिवसात (two-three days) पावसाने धुमाकूळ घातला आहे. राज्यात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. राज्यातील विविध भागात पाऊस कोसळत आहे.

शेतकऱ्यांच्या अनेक पिकांचे नुकसान झाले आहे. नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यात परतीच्या पावसामुळं शेतकऱ्यांचे लाखों रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे. शेती पिकांसह व्यापाऱ्यांनी खरेदी केलेली लाल मिरचीला (Chili Peppers) मोठा फटका बसला आहे. यामुळे सध्या शेतकरी (farmers) आणि व्यापारी चिंतेत आहेत.

नंदूरबार जिल्ह्यात परतीच्या पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. याचा शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसला आहे. कोट्यावधी रुपयांच्या लाल मिरचीचे नुकसान झालं आहे. त्यामुळं या नुकसानीचे पंचनामे करुन भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

मिथुन, मीन, कन्या राशीच्या लोकांना मिळणार चांगली संधी; नशिबाचीही साथ लाभणार

यासह व्यापाऱ्यांना देखील नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी मिरची व्यापारी संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. खरेदी केलेल्या मिरचीला विमा सुरक्षा कवच (Insurance protection cover) द्यावे परतीचा पाऊस आणि आवकळी पाऊस यामुळे मोठे नुकसान होत असते.

पुढील 3 दिवस मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाकडून आज 15 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी

नुकसान भरपाई द्या, शेतकऱ्यांनी केली मागणी

जिल्ह्यात पावसामुळे मिरचीसह कापूस, ज्वारी आणि सोयाबीन या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आणखी दोन दिवस पाऊस सुरू राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. त्यामुळं आणखी शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या (farmers) नुकसानीचे सरसकट पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी. तसेच परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातील खरीप हंगाम वाया गेल्याने सरकारने सरसकट एक रकमी मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

महत्वाच्या बातम्या 
दिलासादायक बातमी! कांद्याच्या बाजारभावात सुधारणा; किती मिळतोय बाजारभाव? जाणून घ्या
सावधान! तुम्ही नकली आले तर वापरत नाही ना? असे ओळखा अस्सल आणि नकली आले
दिलासादायक! अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात तब्बल 3 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी वाटप

English Summary: Loss thousands quintals red pepper heavy rains farmers
Published on: 09 October 2022, 12:40 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)