News

सध्या शेतकऱ्यांना पाचट जाळण्यापासून रोखण्यासाठी राज्य सरकारांच्या स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत आहे. यामुळे यावर उपाय काढण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. यावर उत्तर प्रदेशात योगी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे यावर आळा बसेल, असे म्हटले जात आहे.

Updated on 09 November, 2022 10:03 AM IST

सध्या शेतकऱ्यांना पाचट जाळण्यापासून रोखण्यासाठी राज्य सरकारांच्या स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत आहे. यामुळे यावर उपाय काढण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. यावर उत्तर प्रदेशात योगी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे यावर आळा बसेल, असे म्हटले जात आहे.

युपीमध्ये ज्या शेतकऱ्यांनी पाचट जाळले असेल, अशा प्रकरणात त्यांचा समावेश असेल, अशा शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे दिले जाणार नाहीत असा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांत पाचट जाळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे दिल्लीमधील वायू प्रदूषण घातक स्तरावर पोहोचले आहे.

सरकारच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांनंतरही प्रदूषणाचा स्तर घटलेला नाही. यामुळे दिल्लीतील शाळा देखील बंद करण्यात आल्या आहेत. शेतामधील पाचट जाळणे हे पर्यावरणासाठी अत्यंत घातक आहे. योगी सरकारने गतीने वाढणाऱ्या वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी कठोर निर्णय घेतले गेले आहेत. यावर सरकारचे बारकाईने लक्ष असणार आहे.

साखर निर्यात कोट्यात महाराष्ट्रावर अन्याय, उत्तर प्रदेशला जास्त कोटा...

जर एखादा शेतकरी पाचट जाळताना सापडल्यास, एक एकरपर्यंत शेती असलेल्या शेतकऱ्याला २५०० रुपयांचा दंड केला जाईल. ज्यांची जमीन यापेक्षा अधिक असेल, त्यांनी पाचट जाळल्यास दुप्पट, ५,००० रुपये दंड वसूल केला जाणार आहे. तसेच पीएम किसान योजनेचे पैसेही त्यांना मिळणार नाहीत. असा नियम करण्यात आला आहे.

"कारखान्याच्या वजनकाट्यात एक किलोचा फरक पडला तरी एक लाखाच बक्षीस देणार"

गेल्यावर्षी पाचट जाळण्याच्या विविध २३ प्रकरणांत कारवाई केली होती, असे उपायुक्त अरविंद सिंह यांनी सांगितले. यामुळे आता तरी याचा फायदा होऊन पाचट जाळण्याच्या घटना कमी होणार का याकडे सर्वांचे लक्ष आहे. दिल्लीत सध्या मोठ्या प्रमाणावर प्रदूषण वाढले आहे. यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आता मागेल त्याला मिळणार विहिरीसाठी वाढीव अनुदान
पुढील 48 तासांत पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
शेतकरी होणार करोडपती! महामार्ग शेतात आणि जमिनीला करोडोंचा भाव..

English Summary: farmers burn chachat will not get 2 thousand PM Kisan
Published on: 09 November 2022, 10:03 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)