News

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पाठीमागील संकटाची मालिका काही थांबताना दिसत नाही. खरीप पिकांच्या सुरुवातील पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणी केली मात्र पिके फुलोऱ्यात असतानाच पाऊस गायब झाल्याने पिके सुकायला लागली आहेत. तर काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे पिकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकरी चारही बाजूने संकटात सापडला आहे.

Updated on 08 September, 2022 2:33 PM IST

महाराष्ट्रातील (Maharashtra) शेतकऱ्यांच्या (Farmers) पाठीमागील संकटाची मालिका काही थांबताना दिसत नाही. खरीप पिकांच्या (Kharip Crop) सुरुवातील पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणी केली मात्र पिके फुलोऱ्यात असतानाच पाऊस गायब झाल्याने पिके सुकायला लागली आहेत. तर काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे पिकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकरी चारही बाजूने संकटात सापडला आहे.

मुसळधार पावसाच्या (Heavy Rain) नैसर्गिक संकटातून (natural disaster) सोयाबीन, उडीद, मूग ही पिके सावरत असतानाच आता या पिकांवर आर्मीवर्म कीटकांचा प्रादुर्भाव वाढला आहे. हा धोका फळधारणेच्या वेळी निर्माण झाल्याने त्याचा थेट परिणाम उत्पादनावर होणार असल्याचे बोलले जात आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना पिके उपटून टाकावी लागत आहेत.

सोयाबीन (soybeans) हे खरीप हंगामातील प्रमुख पीक आहे. सोयाबीन पिकाला चांगला भाव मिळाल्याने मराठवाड्यात तसेच विदर्भात सोयाबीनचे क्षेत्र वाढत आहे. दरम्यान पावसाचीही शक्यता होती. आता हवामान मोकळे झाल्याने सोयाबीन, उडीद, मूग, तूर या पिकांवर किडींचा प्रादुर्भाव (Insect infestation) वाढला आहे. राज्यात खरीप हंगामात सोयाबीनची सर्वाधिक पेरणी झाली असून हे पीकही धोक्यात आले आहे.

lumpy disease: पशुपालकांनो सावधान! हजारो जनावरे लम्पी आजाराच्या विळख्यात

आर्मीवर्म किडीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शेतकरी त्रस्त

पिके बहरात असताना या फॉल आर्मीवॉर्मचा (Armyworm) प्रादुर्भाव वाढत आहे. या अळीचा थेट प्रादुर्भाव पिकांच्या पानांवर होतो आणि फळांच्या उत्पादनावरही परिणाम होतो. केवळ सोयाबीनच नाही तर तूर, उडीद, मूग या पिकांचीही हीच स्थिती आहे. एकदा अळीचा प्रादुर्भाव झाला की तो झपाट्याने पसरतो.

त्यामुळे वेळीच योग्य ती उपाययोजना करणे गरजेचे आहे.कृषी विभागाकडे मदतीची विनंती शेतकरी करत आहेत. महाराष्ट्रात आजकाल अनेक जिल्ह्यांतील शेतकरी पिकांवरील कीड, रोगांमुळे त्रस्त आहेत. पिकांवर महागडी औषधे फवारूनही कोणताही परिणाम होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे खर्चात वाढच होत आहे.

7th Pay Commission: फिटमेंट फॅक्टरवर मोठे अपडेट! कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार

शेतकऱ्यांनी कृषी विभागावर आरोप केला

हंगामाच्या सुरुवातीला कृषी विभागाकडून उत्पादन वाढीबाबत मार्गदर्शन केले जाते, असे शेतकरी सांगतात. परंतु, गरजेच्या वेळी कृषी अधिकारी शेतकऱ्यांकडे जात नाहीत. आता निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि रोग व किडींचा वाढता प्रादुर्भाव पाहता शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करून दिलासा देणे हे कृषी विभागाचे काम होते. मात्र याकडे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे उत्पादन कसे वाढणार?

महत्वाच्या बातम्या:
नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून देण्यासाठी रोहित पवारांची धडपड; भरपाईची मागणी
या फळझाडांच्या लागवडीतून मिळेल बक्कळ पैसा! काही वर्षांतच व्हाल श्रीमंत

English Summary: Farmers are in trouble from all sides
Published on: 08 September 2022, 02:33 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)