Others News

रेशन कार्ड अर्थात शिधापत्रिका हे एक महत्त्वाचे कागदपत्र असून या माध्यमातून स्वस्त धान्य योजनेचा लाभ मिळतो हे आपल्याला माहिती आहे. यासाठी शासनाचे काही नियम असून कोणत्या उत्पन्न गटातील व्यक्तीसाठी पात्र आहेत ते देखील सरकारने नमूद केले आहे. परंतु बरेच सरकारी कर्मचारी किंवा ज्यांचे उत्पन्न कालांतराने वाढले आहे ते अजूनही स्वस्त धान्य योजनांचा लाभ घेत आहेत.

Updated on 12 September, 2022 10:48 AM IST

रेशन कार्ड अर्थात शिधापत्रिका हे एक महत्त्वाचे कागदपत्र असून या माध्यमातून स्वस्त धान्य योजनेचा लाभ मिळतो हे आपल्याला माहिती आहे. यासाठी शासनाचे काही नियम असून कोणत्या उत्पन्न गटातील व्यक्तीसाठी पात्र आहेत ते देखील सरकारने नमूद केले आहे. परंतु बरेच सरकारी कर्मचारी किंवा ज्यांचे उत्पन्न कालांतराने वाढले आहे ते अजूनही स्वस्त धान्य योजनांचा लाभ घेत आहेत.

परंतु अशा व्यक्तींनी आता सावध होण्याची गरज असून त्यांनी त्यांचे रेशनकार्ड परत करणे गरजेचे आहे. यासाठी काही नियम आहेत ते आपण पाहु.

नक्की वाचा:Aadhar Card Update : आधार कार्डवरचा फोटो आवडत नाही का? मग आता आधार कार्ड वर फोटो बदलणं झालं अजूनच सोपं, वाचा संपूर्ण प्रोसेस

 तुमची वार्षिक उत्पन्नाची मर्यादा

 तुमचे मासिक अथवा एका वर्षाचे आर्थिक उत्पन्न जर रेशन कार्डच्या आर्थिक उत्पन्नाच्या बाबतीत जी काही मर्यादा आहे ती पार करत असेल आणि तरीसुद्धा तुम्ही स्वस्त धान्य योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.

म्हणून तुम्ही तुमच्या वार्षिक आणि मासिक उत्पन्नाची मर्यादा तपासणे गरजेचे आहे. परंतु तुबे रेशन कार्ड संबंधित आर्थिक उत्पन्नाच्या संबंधित असलेल्या नियम तोडून जर या योजनेचा लाभ घेत असाल तर केंद्र सरकार संबंधित व्यक्तीकडून 27 रुपये प्रति किलोप्रमाणे धान्याची किंमत वसूल करू शकते. जेव्हापासून तुम्ही अपात्र ठरला आहात तेव्हापासून ही वसुली करण्यात येईल.

नक्की वाचा:New Labour Code: नोकरदार वर्गाच्या कामाचे तास,सुट्टीचा दिवस, पीएफ इत्यादींमध्ये होईल बदल, वाचा सविस्तर

 सरकारी कर्मचाऱ्यांसाठी

 आपल्याला माहित आहेच कि बरेच सरकारी कर्मचारी देखील या योजनेचा लाभ घेतात.जर आपण सरकारी कर्मचाऱ्यांचा विचार केला तर अशा कर्मचाऱ्यांची वेतन मर्यादा वाढण्याची शक्यता असल्यामुळे हे आता दारिद्र रेषेखालील येणार नाहीत हे तेवढेच सत्य आहे.

परंतु तरीदेखील केंद्र आणि राज्य सरकारचे कर्मचारी रेशनकार्डचा फायदा घेत असल्याचे दिसल्यास त्यांना तुरुंगवास देखील करू शकतो. त्यासाठी अशा कर्मचाऱ्यांनी रेशन कार्ड परत करावे अशा पद्धतीचे आवाहन करण्यात आले आहे.

 अजून महत्त्वाचे काही नियम

तुम्ही दारिद्र्यरेषेखाली येत नसाल,तूमच्याकडे सर्व प्रकारच्या सुखसोयी आहेत परंतु तरीसुद्धा तुम्ही रेशन कार्डचा फायदा घेतात, कुटुंबातील कोणतीही व्यक्ती सरकारी नोकरीत असेल,

कुटुंबाचे मासिक उत्पन्न प्रतिमहा तीन हजार रुपयांच्या वर असेल, एपीएल योजनेसाठी दरमहा उत्पन्न दहा हजारांपेक्षा जास्त नसावे, किंवा एकापेक्षाजास्त ठिकाणी रेशन कार्ड काढल्यास कारवाई होऊ शकते.

नक्की वाचा:Important: युवकांसाठी व्यवसाय उभा करायला मदत करेल 'ही' योजना, मिळेल 50 लाखापर्यंत कर्ज

English Summary: this is important new rule ragarding ration card holders so know that
Published on: 12 September 2022, 10:48 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)