News

Raju Shetti : राज्यातील शेतकरी प्रश्नावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetti) आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शिंदे फडणवीस सरकारचे लक्ष नसल्याचे शेट्टींनी म्हटलं आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून 22 फेब्रुवारी रोजी राज्यभर चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा राजू शेट्टी यांनी केली आहे.

Updated on 14 February, 2023 10:11 AM IST

Raju Shetti : राज्यातील शेतकरी प्रश्नावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetti) आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शिंदे फडणवीस सरकारचे लक्ष नसल्याचे शेट्टींनी म्हटलं आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून 22 फेब्रुवारी रोजी राज्यभर चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा राजू शेट्टी यांनी केली आहे.

दिवसा वीज, शेतीपंपाचे वाढीव प्रस्तावित वीज दर, ऊस तोडणी मुकादमाकडून होणारी लूट, कापूस, थकीत उसाची एफआरपी, मका, पीक विमा, अतिवृष्टीची भरपाई, तसेच प्रोत्साहनपर अनुदानाची थकीत रक्कम या प्रश्नांवरुन स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे.

बुलढाण्यात शांततेच्या मार्गानं आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर विनाकारण लाठीचार्ज करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करावी, अशी मागणी देखील राजू शेट्टींनी केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची राज्य कार्यकारिणी पैठणमध्ये पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.

दिवसा वीजेसाठी आम्ही गेल्या वर्षभरापासून आंदोलन करतोय, पण सरकार दखल घ्यायला तयार नाही. शेतकऱ्यांनी अजून किती सोसायचं? ऊस तोडणी मुकादमाकडून शेतकऱ्यांची कोट्यवधी रूपये लुबाडले जात आहेत. बुडवणारे मोकाट फिरत आहेत. पोलिस त्यांच्यावर कारवाई करत नाहीत.

कारखाने हात वर करतात. मात्र यामध्ये बळी शेतकऱ्यांचा जात असल्याचे राजू शेट्टी म्हणाले. त्यामुळं आता आमची सहनशिलता संपली आहे. राज्य सरकार विरुद्ध आमची आरपारची लढाई असणार असल्याचे शेट्टी म्हणाले. यावेळी एकूण सहा ठराव संमत करण्यात आले.

7th Pay Commission : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी; सातव्या वेतन आयोगामुळं लाखावर पोहोचला पगार

राज्यकार्यकारिणी बैठकीतील ठराव

  • थकीत विज बिलापोटी शेती वीज कनेक्शन तोडण्याचे सत्र सुरू आहे. ते ताबडतोब थांबवावे व संभाव्य विजदर वाढीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सक्त विरोध आहे.
  • कृषी संजीवनी योजनेस मुदत वाढ देऊन ( 31 मार्चपर्यंत ) 50 टक्के वीज बिल भरून मागील विज बिल सर्व थकीत शेतकऱ्यांना मुक्त करावं.
  • रासायनिक खतांच्या किंमती कमी करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने संयुक्त पणाने प्रयत्न करावेत. अन्यथा भारताची अवस्था श्रीलंकेसारखी झाल्याशिवाय राहणार नाही
  • ज्या ज्या शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी तक्रारी नोंदवलेल्या आहेत त्या शेतकऱ्यांचे विम्यांचे पैसे तातडीने देण्याचे विमा ( कंपनीना ) आदेश द्यावेत.
  • बुलढाणा येथील शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर विनाकारण लाठीचार्ज करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करावी.
  • महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयावर विज, कापूस, मका तोडणी, सोयाबीन दरवाढ, पीक विमा, कांद्याचे भाव, ऊसाची FRP, अतिवृष्टीचे नुकसान भरपाई या विषयावर रास्ता रोको करण्यात येईल.
  • व्हॅलेंटाईन डेला स्वस्त सोने-चांदी खरेदी करण्याची सुवर्ण संधी, येथे जाणून घ्या 14, 18, 22, 23 आणि 24 कॅरेटची किंमत

English Summary: Raju Shetti : Chakka jam movement across the state on February 22 for farmers' issues
Published on: 14 February 2023, 10:11 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)