News

यंदाच्या वर्षी देशाच्या काही भागामध्ये मुसळधार पाऊस पडला आहे जे की या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाती असलेले पीक सुद्धा निघून गेले आहे. यंदा या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसलेला आहे. मात्र शेतकऱ्यानं चिंता करण्याचे कोणतेही काम नाही. कारण सरकारची ही योजना शेतकऱ्यांना नुकसानभरपाई करून देणार आहे. जे की ही योजना शेतकऱ्यानं माहीत देखील आहे. या योजनेचे नाव प्रधानमंत्री फसला बिमा योजना असे आहे. प्रधानमंत्री फसल बिमा योजनेमध्ये शेतकऱ्यांनी आपली नोंदणी करणे गरजेचे आहे जे की आशा शेतकऱ्यांना सरकारकडून नुकसानभरपाई भेटणार आहे.

Updated on 19 September, 2022 3:51 PM IST

यंदाच्या वर्षी देशाच्या काही भागामध्ये मुसळधार पाऊस पडला आहे जे की या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाती असलेले पीक सुद्धा निघून गेले आहे. यंदा या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसलेला आहे. मात्र शेतकऱ्यानं चिंता करण्याचे कोणतेही काम नाही. कारण सरकारची ही योजना शेतकऱ्यांना नुकसानभरपाई करून देणार आहे. जे की ही योजना शेतकऱ्यानं माहीत देखील आहे. या योजनेचे नाव प्रधानमंत्री फसला बिमा योजना असे आहे. प्रधानमंत्री फसल बिमा योजनेमध्ये शेतकऱ्यांनी आपली नोंदणी करणे गरजेचे आहे जे की आशा शेतकऱ्यांना सरकारकडून नुकसानभरपाई भेटणार आहे.

नैसर्गिक आपत्ती असेल तर भेटणार नुकसानभरपाई :-

पंतप्रधान फसल बिमा योजना अंतर्गत अवर्षण, अवकाळी पाऊस, बेमौसमी पाऊस तसेच अतिवृष्टीमुळे आलेला पूर या अनेक गोष्टींमुळे शेतकऱ्यांची झालेली नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. जे की ज्या ज्या शेतकऱ्यांनी पंतप्रधान फसल बिमा योजनेत नोंदणी केली आहे अशा शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळते. नैसर्गिकरित्या आपत्तीमुळे या योजनेमध्ये शेतकऱ्यांना नुकसानभरपाई भेटते. आताच्या स्थिती पर्यंत जवळपास ३६ कोटी शेतकऱ्यांना या पंतप्रधान फसल बिमा योजनेचा लाभ मिळालेला आहे.

हेही वाचा:-जाणून घ्या लिंबाचे लोणचे खाण्याचे जबरदस्त फायदे, वाचून बसणार नाही विश्वास.

 

 

 

शेतकऱ्यांना करावे लागणार अर्ज :-

देशातील शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात मात्र शेतकऱ्यांना अर्ज भरावा लागतो. अर्ज भरण्याच्या दोन पद्धती आहेत जे की एक ऑनलाइन आणि दुसरी ऑफलाईन. जर शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज करायचा असेल तर त्यांना या योजनेच्या https://pmfby.gov.in वेबसाईटवर जाऊन भेट द्यावी लागेल. जे की या वेबसाईटवर सर्व विहित प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. तर ज्या शेतकऱ्यांना ऑफलाईन अर्ज करायचा असेल तर त्यांनी जवळची बँक, सहकारी बँक तसेच कॉमन सर्व्हिस सेंटर या ठिकाणी उपलब्ध आहे. या योजनेत सहभागी होयच असेल तर पेरणी करण्याआधी १० दिवस तुम्हाला अर्ज सादर करावा लागेल.

हेही वाचा:-शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना! भाजीपाला निर्यात करायचा असेल तर लागणार या कागदपत्रांची आवश्यकता

 

 

अर्ज करण्यासाठी महत्वाची कागदपत्रे :-

नैसर्गिकरित्या आपत्तीमुळे जर पिकांचे नुकसान झाले तर कंपनीला ७२ तास कालावधीमध्ये कळवावे लागेल. या ७२ तास कालावधीच्या काळात विमा कंपनीला कळवावे लागेल. पंचनामे झाले की त्यानंतर नुकसानीचा अंदाजित आकडा नोंदवण्यात येतो जे की पिकांचे किती नुकसान झाले आहे याचा अंदाज लावण्यात येतो. नुकसानभरपाई ची रक्कम तुमच्या थेट बँक खात्यात जमा होते. तुम्हाला या योजनेत सहभागी होयच असेल तर त्यासाठी राशन कार्ड, बँक खाते, आधार क्रमांक, पासपोर्ट फोटो, शेतीचा खासरा क्रमांक, रहिवाशी दाखला(वाहन परवाना, मतदान ओळखपत्र), इत्यादी सर्व प्रकारची कागदपत्रे महत्वाची आहे.

English Summary: Important notice for farmers! There is no need to worry even if there is damage due to rain, but an application will have to be submitted for this scheme
Published on: 19 September 2022, 03:51 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)