Horticulture

फळबाग लागवडीमध्ये शेतकऱ्यांचा आता मोठ्या प्रमाणात कल आहे. जर आपण फळबागांचा विचार केला तर महाराष्ट्र मध्ये विविध प्रकारच्या फळबागांची लागवड केली जाते. शेतीमध्ये येत असलेले नवयुवक मोठ्या प्रमाणावर फळबाग लागवडीकडे वळत आहेत. जर आपण बऱ्याच फळ पिकांचा विचार केला तर निर्यातीला खूप मोठ्या संधी आहेत. परंतु फळांची निर्यात करताना बऱ्याच गोष्टींचे पालन करणे खूप गरजेचे असते.

Updated on 04 November, 2022 9:22 AM IST

 फळबाग लागवडीमध्ये शेतकऱ्यांचा आता मोठ्या प्रमाणात कल आहे. जर आपण फळबागांचा विचार केला तर महाराष्ट्र मध्ये विविध प्रकारच्या फळबागांची लागवड केली जाते. शेतीमध्ये येत असलेले नवयुवक मोठ्या प्रमाणावर फळबाग लागवडीकडे वळत आहेत. जर आपण बऱ्याच फळ पिकांचा विचार केला तर निर्यातीला  खूप मोठ्या संधी आहेत. परंतु फळांची निर्यात करताना बऱ्याच गोष्टींचे पालन करणे खूप गरजेचे असते.

नक्की वाचा:Banana Farming: केळीच्या कांदेबाग लागवडीच्या माध्यमातून हवे भरपूर उत्पादन तर अशा पद्धतीचे व्यवस्थापन आहे महत्त्वाचे, वाचा डिटेल्स

 तुम्हाला ज्या देशांमध्ये फळांची निर्यात करायचे आहेत त्या त्या देशांचे विविध मानके आणि निकष असतात, त्यांचे देखील तंतोतंत पालन करणे गरजेचे असते. या माध्यमातून फळांची निर्यात करण्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे याबद्दल माहिती घेऊ.

 तुम्हालाही करायची आहे फळांचे निर्यात तर या गोष्टींची घ्या काळजी

1- यामध्ये सगळ्यात अगोदर म्हणजे तुम्हाला जी फळे निर्यात करायचे आहेत त्याच्यावर कुठलाही प्रकारच्या रोग व किडीचा प्रादुर्भाव नसावा  व ती हिरव्या रंगाची तसेच नाजूक असावी.

2- तसेच काही भागांमध्ये डागाळलेले फळे असतात किंवा काही पिवळी देखील असतात. अशा फळांना निवडून वेगळे करून घेणे गरजेचे असते. म्हणजेच फळांचे प्रतवारी करूनच निर्यातीसाठी फळांची निवड करणे महत्त्वाचे आहे.

3- तुम्हाला ज्या फळांची निर्यात करायची आहे अशा फळांच्या पॅकिंगसाठी तुम्ही जूटच्या धाग्यापासून तयार केलेल्या मोठ्या आकाराच्या पिशव्यांचा वापर करणे गरजेचे आहे जेणेकरून हवा खेळती राहते.

नक्की वाचा:Coconut Farming: शेतकरी बंधूंनो! नारळ फळबागात होतो 'या' रोगांचा प्रादुर्भाव, अशा पद्धतीने कराल नियंत्रण तर मिळेल फायदा

4- फळे गुंडाळण्यासाठी टिशू पेपरचा वापर करणे महत्त्वाचे ठरते. यामुळे बाष्पीभवन कमी होते व फळे टिकण्याचा कालावधी वाढतो.

5- थंड वातावरण असताना फळांची तोडणी करणे गरजेचे असते. साधारणपणे तापमान 7 ते 10° आणि आद्रता 90 ते 95 टक्के पर्यंत असावी.

6- टिशू पेपरचा वापर पॅकिंगसाठी करणे गरजेचे असून त्यानंतर कॅरोगेटेड फायबर बोर्ड बॉक्स वापरावे.

7- जी फळे निर्यातीसाठी  पाठवायचे आहे अशा फळांवर कीटकनाशकाची किंवा बुरशीनाशकाचे अवशेष हे एम आर लेव्हल पेक्षा जास्त नसावेत.

8- या बुरशीनाशकावर किंवा कीटकनाशकाचा वापरावर बंदी घातली आहे अशा कीटकनाशकांची फवारणी भाजीपाला पिकामध्ये करू नये.

नक्की वाचा:Crop Protection: फळबागांची कर्दनकाळ आहे फळमाशी, या पद्धतीने कराल नियंत्रण तेव्हाच टळेल नुकसान, वाचा डिटेल्स

English Summary: this is main important thinks to do precaution in fruit export
Published on: 04 November 2022, 09:22 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)