Horticulture

ता आठ ते नऊ महिने कांदा आपल्याला साठवता येणार आहे. घोडेगावच्या माऊलीने हा पर्याय काढला आहे. यामुळे आता जेव्हा जास्त बाजारभाव असेल तेव्हाच विक्री करत येणार आहे.

Updated on 30 March, 2022 3:03 PM IST

कांदा हे अनेक शेतकऱ्यांचे मुख्य पीक, अनेकदा यामधून अनेक शेतकरी लखपती होतात, तर अनेक शेतकरी मोठा तोटा सहन करतात. असे असताना अनेक शेतकरी कांद्याची लागवड करतात मात्र कांदा जास्त दिवस साठवून ठेवता येत नसल्याने त्यांना अनेकदा बाजारभाव नसताना देखील तो विकावा लागतो. उन्हाळी कांदा टिकतच नाही त्यामुळे काढणी, छाटणी झाली की लागलीच विक्री हे ठरलेले सूत्र आहे.

आता मात्र यावर पर्याय काढला आहे. आता आठ ते नऊ महिने कांदा आपल्याला साठवता येणार आहे. घोडेगावच्या माऊलीने हा पर्याय काढला आहे. यामुळे आता जेव्हा जास्त बाजारभाव असेल तेव्हाच विक्री करत येणार आहे. आता कांदा काढणीनंतरही कांदा टिकून राहील अशा (Onion Seed) बियाणांचा त्यांनी शोध घेतला. यासाठी शेतकऱ्यांच्या गाठीभेटी आणि (KVK) केव्हीके कृषी संस्थेचा अभ्यास त्यांनी केला.

केव्हीके येथील ‘भीमा शक्ती’चे बियाणेच उत्पादन वाढीचा ‘टर्निंग पॉईंट’ ठरणार आहे. वाढीव दर मिळताच विक्री करण्याचा पर्याय माऊलीकडे असल्याने यामधून विक्रमी उत्पन्न मिळेल असा त्यांचा दावा आहे. यामुळे येणाऱ्या काळात इतर शेतकऱ्यांना देखील याचा फायदा होणार आहे.

कांदा काढणीनंतर तो 2 ते 3 महिने टिकून राहतो, नंतर मात्र शेतकऱ्यांचे नुकसान होते. अशा परस्थितीमध्ये दर कमी-जास्त झाला तरी त्याची परवा न करता शेतकऱ्यांना कांदा हा विकावाच लगतो. त्यामुळे उत्पादन वाढणे महत्वाचे नाही तर उत्पादित झालेल्या कांद्याचे नियोजन महत्वाचे आहे. यामुळे आता पुढील काही दिवसांनंतर जास्त दिवस टिकेल आणि दर्जा कमी होणार नाही, असा कांदा बाजारात येईल.

ताज्या बातम्या;
ज्याची शेतकऱ्यांना भीती होती तेच झाले, आता लाखाचे होणार बारा हजार; केंद्राच्या निर्णयाने शेतकऱ्यांना धक्क
दुग्धव्यवसायाला द्या आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, मग नाही कसल्याही नोकरीची गरज
काय सांगता! गायींना गाणी ऐकवली तर दूध जास्त देतात? खरी माहिती आली समोर..

English Summary: farmers due to 'Bhim Shakti', now the problem of onion storage is solved forever ..
Published on: 30 March 2022, 03:03 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)