Horticulture

भारत हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. भारतीय अर्थव्यवस्था आणि शेती आधारित अर्थव्यवस्था आहे.शेतीसाठी योग्य माती, सूर्यप्रकाश, पाणी आणि खत आवश्यक असते. या घटकांचा वापर केल्याशिवायशेती करता येत नाही. शेतीमध्ये पिके किंवा झाडे काही महिन्यात किंवा वर्षात प्रथम जमिनीत रोपे किंवा बीए लावून तयार केले जातात.

Updated on 04 January, 2022 5:04 PM IST

 भारत हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. भारतीय अर्थव्यवस्था आणि शेती आधारित अर्थव्यवस्था आहे.शेतीसाठी योग्य माती, सूर्यप्रकाश, पाणी आणि खत आवश्यक असते. या घटकांचा वापर केल्याशिवायशेती करता येत नाही. शेतीमध्ये पिके किंवा झाडे काही महिन्यात किंवा वर्षात प्रथम जमिनीत रोपे किंवा बीए लावून तयार केले जातात.

परंतु शेतकरी आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आधुनिक शेतीकडे वळत आहेत. आता काळ बदलत आहे त्याप्रमाणे नवीन तंत्राचा वापर करून माती व्यतिरिक्त पाण्यात देखील भाजीपाला पिकवता येऊ लागला आहे. या लेखात आपण अशाच एका तंत्रज्ञानाबद्दल जाणून घेणार आहोत त्याला एक्वापोनिक्स कल्चर म्हणतात.या तंत्रज्ञानाच्या आधारे कमी पाण्यात चांगले पीक तयार केले जाते.

एक्वापोनिक्स शेती म्हणजे काय?

 या प्रकारची शेती अनेक देशांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी केली जाते. परंतु भारतात बेंगलोर मध्ये सर्वात मोठे आणि पहिले एक्वापोनिक्स  शेत आहे. त्याचे नाव माधवी फार्म असे आहे. या तंत्रज्ञानामध्ये पाण्याच्या टाक्या किंवा लहान तलाव तयार केले जातात. यामध्ये मासे ठेवले जातात. या माशांच्या विष्टेने पाण्यात अमोनियाचे प्रमाण वाढते व हे पाणी तयार टाक्यामध्ये  घातले जाते.

या टाकीमध्ये मातीऐवजी नैसर्गिक फिल्टरचा वापर केला जातो आणि वनस्पती मातीऐवजी पाण्यातून आवश्यक पोषक द्रव्ये शोषून घेतात. त्यानंतर हे पाणी पुन्हा फिश टँक मध्ये टाकले जाते. हि प्रक्रिया पुन्हा-पुन्हा केली जाते. जेणेकरून पाण्याचा अपव्यय होणार नाही.या तंत्राचा वापर करून वाळवंटी प्रदेशात, खारट ठिकाणी तसेच रेताड जमिनीत व बर्फाळ प्रदेशात अशा ठिकाणी पीक सहज घेता येते. यामुळे देशात स्थित लाखो हेक्‍टर नापीक जमीन शेतीसाठी वापरता येईल. या तंत्राचा वापर केल्याने उपजीविकेचे साधन देखील वाढेल आणि सामान्य शेतीच्या तुलनेत या तंत्राचा वापर केल्यामुळे 90 टक्के पाण्याची बचत होईल. या तंत्रात पीक जमिनीच्या पिकापेक्षा तीन पट वेगाने वाटते. ही पूर्णपणे सेंद्रिय शेती आहे. जमिनीत लागवडीच्या तुलनेत या तंत्राचा वापर करून पिकवलेल्या पिकांमध्ये चाळीस टक्क्यांपर्यंत अधिक पोषक तत्वे असतात. याव्यतिरिक्त मासे खाण्यासाठी वापरले जाऊ शकतात आणि विकून चांगले उत्पन्न देखील मिळू शकते.

एक्वापोनिक्स शेती विषयी महत्वाची माहिती

  • ही शेती एक पर्यावरण दृष्ट्या टिकाऊ मॉडेल आहे. ज्यामध्ये हायड्रोपोनिक्स ला मत्स्यपालनासह एकत्र करून शेती केली जाते.
  • या तंत्रात मासे आणि वनस्पती एकाच यंत्रणेत एकत्र वाढतात.
  • वनस्पतींना माशांच्या विष्ठेपासून सेंद्रिय खत मिळते, जे पाणी शुद्ध करते आणि संतुलित वातावरण निर्माण करते.
  • तिसरा सहभागी म्हणजे सूक्ष्मजीव किंवा नायाट्रायफाईन्ग बॅक्टेरिया माशांमध्ये असणाऱ्या महिन्याचे नायट्रेट मध्ये रूपांतर करतात. वनस्पतींच्या वाढीसाठी एक खूप फायदेशीर आहे.
  • या हायड्रोपोनिक पद्धतीमध्ये झाडे मातीशिवाय पाण्यामध्ये वाढतात ज्यात मातीची जागा पाण्याने घेतली जाते.
  • या प्रक्रियेसाठी नैसर्गिक व कृत्रिम तलाव, गोड्या पाण्याचे तलाव किंवा समुद्रात योग्य तंत्रज्ञान आणि उपकरणे यांची आवश्यकता असते.
  • या प्रकारच्या शेतीमध्ये मासे आणि मोलस्कसारख्या जलीय  प्राण्यांचा विकास, कृत्रिम प्रजनन आणि साठवण केली जाते.
  • एक्वा कल्चर म्हणजे एकाच प्रजातीच्या प्राण्यांचे उत्पादन घेतले जाते जे माउस किंवा अन्य उपउत्पादनांच्या स्वरूपात असते.

 एक्वा पोनिक्स शेतीचे काही फायदे

  • चांगली आणि जास्तीचे उत्पन्न आणि दर्जेदार उत्पादन मिळते.
  • ज्या जमिनी लागवडी योग्य नाहीत जसे की वाळवंट,खारट,वालुकामय, बर्फाळ इत्यादी शेतीसाठी वापरता येतात
  • वनस्पती आणि मासे दोन्हींचा खाण्यासाठी आणि उत्पन्नासाठी वापर केला जातो.
English Summary: aquaponics farming is benificial method of modern farming
Published on: 04 January 2022, 05:04 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)