Government Schemes

PM Kisan: केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लागावा यासाठी वर्षाला ६००० हजार रुपये दिले जातात. शेतकऱ्यांच्या खात्यावर आतापर्यंत या योजनेचे ११ हफ्ते वर्ग करण्यात आले आहेत. मात्र १२ व्या हफ्त्याचे पैसे वर्ग करण्याअगोदर ई-केवायसी करणे बंधनकारक केले आहे.

Updated on 08 September, 2022 5:16 PM IST

PM Kisan: केंद्र सरकारने (Central Goverment) शेतकऱ्यांसाठी (farmers) पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लागावा यासाठी वर्षाला ६००० हजार रुपये दिले जातात. शेतकऱ्यांच्या खात्यावर आतापर्यंत या योजनेचे ११ हफ्ते वर्ग करण्यात आले आहेत. मात्र १२ व्या हफ्त्याचे पैसे वर्ग करण्याअगोदर ई-केवायसी (E-KYC) करणे बंधनकारक केले आहे.

मात्र आता केंद्र सरकारने जे लोक या योजनेसाठी पात्र नाहीत त्यांच्यावर कारवाई करायला सुरुवात केली आहे. अपात्र लोकांनी (Ineligible people) फायदा घेतला असेल तर त्यांच्याकडून पैसे वसूल करण्यात येणार आहेत.

तुम्ही पण यादीत नाही का?

जर तुम्ही लवकरात लवकर भुलेखांची पडताळणी केली नाही तर तुमचे नावही या यादीतून बाहेर जाऊ शकते. नियमांनुसार, तुम्ही आयकरदाते असाल, सरकारी संस्थेत काम करत असाल तरीही तुमचा पत्ता या यादीतून वजा केला जाईल. तुमचा लाभार्थी यादीत आहे की नाही यासाठी तुम्ही पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन लाभार्थी यादीत तुमचे नाव तपासू शकता.

या फळझाडांच्या लागवडीतून मिळेल बक्कळ पैसा! काही वर्षांतच व्हाल श्रीमंत

पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये घट होणार आहे

या वेळी पंतप्रधान किसान सन्मान निधी अशा शेतकऱ्यांना पाठवला जाणार नाही, जे पोर्टलला भेट देऊन ९ सप्टेंबरपर्यंत भुलेखांची माहिती देऊ शकणार नाहीत. सध्या शासनाकडून त्याच्या पडताळणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

शेतकऱ्यांनी 9 तारखेपर्यंत पोर्टलला भेट देऊन भुलेखांची मोजणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, पडताळणीच्या प्रक्रियेमुळे, यावेळी पीएम किसान लाभार्थ्यांची संख्या लक्षणीयरीत्या कमी होईल.

नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून देण्यासाठी रोहित पवारांची धडपड; भरपाईची मागणी

21 लाख लोक अपात्र ठरले आहेत.

दरम्यान, उत्तर प्रदेश सरकारच्या कृषीमंत्र्यांनी सांगितले की, राज्यात पीएम किसान सन्मान निधीचा लाभ घेणारे 21 लाख लोक अपात्र असल्याचे आढळले आहे. यापैकी अनेकांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत.

आतापर्यंतचे सर्व हप्ते या लोकांकडून वसूल केले जात आहेत. उर्वरित लोकांनाही नोटिसा पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्रत्येक शेतकऱ्याकडून 22-22 हजार रुपये वसूल करावे लागतील.

पडताळणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे

कृषिमंत्री सूर्यप्रताप शाही यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत सरकारकडून मिळालेल्या यादीनुसार, उत्तर प्रदेशातील लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या २.८५ कोटी आहे. तपासणीअंती एकूण २१ लाख शेतकरी अपात्र आढळून आले आहेत.

सध्या वास्तविक शेतकऱ्यांची एकूण संख्या २.६५ कोटी आहे. सुमारे 1.71 कोटी शेतकऱ्यांची पूर्णपणे पडताळणी करण्यात आली आहे. सध्या ई-केवायसी पडताळणीनंतर शेतकऱ्यांची संख्या १.७० कोटी आहे.

महत्वाच्या बातम्या:
ग्राहकांना दिलासा! सणासुदीच्या मुहूर्तावर खाद्यतेलाच्या किमती घसरणार; मात्र शेतकऱ्यांच्या अडचणी वाढणार
निसर्गाचा लहरीपणा! अगोदर धो धो पाऊस आणि आता किडींचा प्रादुर्भाव; शेतकरी चारही बाजूनी संकटात

English Summary: PM Kisan: 21 lakh farmers will not get PM Kisan money; Look
Published on: 08 September 2022, 05:16 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)