Government Schemes

PM Kisan: देशातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने अनेक योजना सुरु केल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी आर्थिक हातभार लागत आहे. केंद्र सरकारच्या योजनेतील महत्वाची योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना होय. या योजनेतून शेतकऱ्यांना वर्षातून ६००० हजार रुपये दिले जातात.

Updated on 04 September, 2022 4:22 PM IST

PM Kisan: देशातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने (Central Government) अनेक योजना सुरु केल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना (Farmers) शेतीसाठी आर्थिक हातभार लागत आहे. केंद्र सरकारच्या योजनेतील महत्वाची योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना होय. या योजनेतून शेतकऱ्यांना वर्षातून ६००० हजार रुपये दिले जातात.

चार महिन्यांत येणाऱ्या दोन हजार रुपयांच्या रकमेतून शेतकऱ्यांना मोठा फायदा होतो. आतापर्यंत केंद्र सरकारने पीएम किसान योजनेचे (PM Kisan Yojana) 11 हप्ते शेतकऱ्यांना पाठवले आहेत, तर अन्नदाते 12 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत.

पीएम किसान योजनेचा हप्ता कधी येणार?

ताज्या अपडेटनुसार, पीएम किसान योजनेचा 12 वा हप्ता सप्टेंबरच्या कोणत्याही तारखेला येऊ शकतो. 1 एप्रिल ते 31 जुलै दरम्यान चार महिन्यांच्या अंतराने एका वर्षात 3 हप्त्यांमध्ये द्यावयाच्या रकमेचा पहिला हप्ता दिला जातो. यानंतर, दुसरा क्रमांक 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर दरम्यान खात्यात येतो. त्याचवेळी शेतकऱ्यांना 1 डिसेंबर ते 31 मार्च दरम्यान तिसरा हप्ता मिळेल.

EPFO: व्यवसाय करणाऱ्यांनाही मिळणार पेन्शन; EPFO ​​ची योजना

तुम्हाला सांगतो की जेव्हा ही योजना 2019 मध्ये सुरू झाली तेव्हा या योजनेचा लाभ फक्त लहान आणि अत्यल्प शेतकऱ्यांनाच दिला जात होता. मात्र नंतरच्या काळात या आराखड्यात अनेक दुरुस्त्या करण्यात आल्या. आता सर्व शेतकरी कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे.

ई-केवायसीची मुदत वाढवली आहे

ई-केवायसी (E-KYC) करण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट २०२२ होती. पण ती पुन्हा वाढवण्यात आली आहे. अद्याप ई-केवायसी केले नसल्यास, तुम्ही पुढील हप्ता चुकवू शकता. पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता लवकरच येणार आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातही पैसे ट्रान्सफर होऊ शकतात, असे मानले जाते.

CNG Cars: संधीच करा सोनं! या वेबसाइटवर मिळतायेत सर्वात स्वस्त सीएनजी कार...

त्यांना पैसे मिळणार नाहीत

ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेसाठी नोंदणी करताना चुका केल्या आहेत, त्या शेतकऱ्यांचे पैसे अडकू शकतात. आधार कार्डशी नाव जुळले नाही तरी पैसे अडकू शकतात. बँक खाते बरोबर नसले तरीही तुमचे पैसे गोठवले जाऊ शकतात. याशिवाय आयकर भरणारे किंवा सरकारी संस्थांमध्ये काम करणारे शेतकरीही या योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित राहणार आहेत.

महत्वाच्या बातम्या:
...तर भाजप २०२४ ला फक्त ५० जागांवर निवडून येईल
विषयचं हार्ड! स्वतःची बाईक चोरीला गेली म्हणून पठ्याने चोरल्या तब्बल 29 बाईक

English Summary: PM Kisan: 2000 thousand rupees will come to the farmer's account
Published on: 04 September 2022, 04:22 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)