Government Schemes

अनेकदा शेतकरी अपघातात मृत्युमुखी पडतो, किंवा शेतकऱ्याला अपंगत्व येते. यामुळे त्याला मदतीची गरज असते. यामुळे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा (Farmer Insurance) योजनेअंतर्गत त्याला मदत केली जाते. यामुळे शेतकऱ्यांनी याचा अर्ज करण्याचे आवाहन केले जात आहे.

Updated on 02 December, 2022 5:10 PM IST

अनेकदा शेतकरी अपघातात मृत्युमुखी पडतो, किंवा शेतकऱ्याला अपंगत्व येते. यामुळे त्याला मदतीची गरज असते. यामुळे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा (Farmer Insurance) योजनेअंतर्गत त्याला मदत केली जाते. यामुळे शेतकऱ्यांनी याचा अर्ज करण्याचे आवाहन केले जात आहे.

दरम्यान, आता ७ एप्रिल ते २२ ऑगस्ट २०२२ या कालावधीत अपघातात मृत्यू पावलेल्या अथवा अपंगत्व आलेल्या शेतकऱ्यांनी (Farmer) अथवा त्याच्या वारसदारांनी प्रस्ताव सादर केले नसल्यास आवश्यक कागदपत्रासह प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे.

यामुळे शेतकऱ्यांच्या कुटूंबाला आधार मिळणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील ७ एप्रिल २०२२ ते २२ ऑगस्ट २०२२ या कालावधीत अपघातात मृत्यू पावलेल्या अथवा अपंगत्व आलेल्या शेतकऱ्यांनी अथवा त्यांच्या वारसदारांनी प्रस्ताव सादर करावेत.

हमीभावाचा कायदा करायचा झाल्यास ग्रामपंचायत ते संसदेपर्यंतची लढाई आता रस्त्यावर सुध्दा लढणार

संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालय, मंडल कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक यांच्याशी तत्काळ संपर्क साधून विहित नमुन्यात व आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव सादर करावेत, असे सांगण्यात आले आहे.

ब्रेकिंग! राज्यातील दोन जिल्ह्यात सापडल्या सोन्याच्या खाणी

शंभरकर म्हणाले, की ही योजना ७ एप्रिल ते २२ ऑगस्ट २०२२ या कालावधीकरिता खंडित झाली होती. शासन निर्णयानुसार उपरोक्त कालावधीतील प्राप्त विमा दाव्यांना तपासणी नंतर मंजुरी देण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या;
अखेर राज्यपालांच्या हकालपट्टीचा मुहूर्त ठरला? शिवछत्रपतींचा अवमान केल्यामुळे होणार कारवाई
पालकांनो मुलांची काळजी घ्या, पुण्यात गोवरचे 5 रुग्ण, प्रशासन सतर्क
दहा ते चौदा महिन्यात १०० ते ११० टन उत्पादन, उसाच्या नवीन जातीचा लागला शोध

English Summary: Apply Gopinath Munde Shetkari Accident Insurance Scheme
Published on: 02 December 2022, 05:10 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)