1. बातम्या

MFOI VVIF Kisan Bharat Yatra : किसान भारत यात्रेचा पुढचा प्रवास मध्य आणि पश्चिम भारतात; झाशी येथून होणार सुरुवात

MFOI Update : आत्तापर्यंत 'किसान भारत यात्रे'चे दोन टप्पे पूर्ण झाले आहेत. पहिला प्रवास 30 जानेवारी 2024 रोजी दिल्लीहून निघाला. जो उत्तर भारतमध्ये सुरु आहे. तर दुसरी यात्रा 6 फेब्रुवारी रोजी कोईम्बतूर येथून रवाना झाली. दक्षिण भारतातील राज्यांमध्ये जाऊन शेतकऱ्यांना जागरूक करणे हा त्यामागचा उद्देश आहे. कृषी जागरण आता तिसऱ्या प्रवासासाठी सज्ज आहे, जे मध्य आणि पश्चिम भारतातील राज्यांमध्ये जाऊन शेतकऱ्यांना MFOI बद्दल जागरूक करणार आहे.

MFOI VVIF Kisan Bharat Yatra Update

MFOI VVIF Kisan Bharat Yatra Update

MFOI Kisan Bharat Yatra Update : भारत हा कृषीप्रधान देश आहे. देशाच्या विकासात शेतकऱ्यांचा नेहमीच महत्त्वाचा वाटा राहिला आहे. पण त्याला जो मान्य सन्मान मिळायला हवा तो कधीच मिळाला नाही. शेतकऱ्यांना ही ओळख देण्यासाठी, देशातील अग्रगण्य कृषी मीडिया हाऊस कृषी जागरणने 'मिलियनेअर फार्मर ऑफ इंडिया' पुरस्कार (MFOI) हा उपक्रम सुरू केला आहे. त्याअंतर्गत कृषी विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या आणि सातत्याने प्रगती करणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. MFOI या या उपक्रमाची शेतकऱ्यांना जाणीव करून देण्यासाठी कृषी जागरणने किसान भारत यात्रा देखील सुरू केली आहे. ही यात्रा देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन शेतकऱ्यांना 'मिलियनेअर फार्मर ऑफ इंडिया' पुरस्काराबाबत जागरुक करून अवॉर्ड शोमध्ये सहभागी होण्याची प्रेरणा देत आहे.

'किसान भारत यात्रेचा' तिसरा टप्पा लवकरच

आत्तापर्यंत 'किसान भारत यात्रे'चे दोन टप्पे पूर्ण झाले आहेत. पहिला प्रवास 30 जानेवारी 2024 रोजी दिल्लीहून निघाला. जो उत्तर भारतमध्ये सुरु आहे. तर दुसरी यात्रा 6 फेब्रुवारी रोजी कोईम्बतूर येथून रवाना झाली. दक्षिण भारतातील राज्यांमध्ये जाऊन शेतकऱ्यांना जागरूक करणे हा त्यामागचा उद्देश आहे. कृषी जागरण आता तिसऱ्या प्रवासासाठी सज्ज आहे, जे मध्य आणि पश्चिम भारतातील राज्यांमध्ये जाऊन शेतकऱ्यांना MFOI बद्दल जागरूक करणार आहे.

मध्य आणि पश्चिम भारतात ५ मार्चपासून प्रवास

मध्य आणि पश्चिम भारतासाठी 'किसान भारत यात्रा' मंगळवार, 5 मार्च 2024 रोजी रवाना होणार आहे. त्यासाठी उत्तर प्रदेशातील झाशी येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेला झाशी येथील आरएलबी केंद्रीय कृषी विद्यापीठाचे कुलगुरू हिरवा झेंडा दाखवणार असून यात्रेला प्रारंभ होणार आहे. या कालावधीत शेतीमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या शेतकऱ्यांचाही कृषी जागरणतर्फे गौरव करण्यात येणार आहे.

MFOI किसान भारत यात्रा म्हणजे काय?

'MFOI किसान भारत यात्रा 2023-24' मध्ये ग्रामीण परिस्थिती बदलणाऱ्या स्मार्ट गावांची कल्पना आहे. MFOI किसान भारत यात्रेचे उद्दिष्ट डिसेंबर 2023 ते नोव्हेंबर 2024 पर्यंत देशभरात फिरून 1 लाखांहून अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचे आहे. ज्यामध्ये 4 हजाराहून अधिक ठिकाणांचे प्रचंड जाळे आणि 26 हजार किलोमीटरहून अधिक उल्लेखनीय अंतर कव्हर केले जाईल. या अभियानाचा प्राथमिक उद्देश शेतकरी समुदायांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणणे आहे. जेणेकरून शेतकऱ्यांची सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमी वाढवून त्यांना सक्षम बनवता येईल.

एक लाखांहून अधिक शेतकऱ्यांना जोडण्याचे लक्ष्य

या किसान भारत यात्रेच्या माध्यमातून देशभरातील करोडपती आणि लक्षपती असणाऱ्या लाखोंहून अधिक शेतकऱ्यांना जोडण्याचे महत्त्वाचे काम आहे. ही देशव्यापी यात्रा एक लाखाहून अधिक शेतकरी जोडेल, 4520 ठिकाणे पार करेल आणि 26,000 किलोमीटरहून अधिक अंतर कापेल. एवढ्या मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांशी जोडून ही यात्रा त्यांची यशोगाथा जगासमोर आणेल.

English Summary: MFOI VVIF Kisan Bharat Yatra Next journey of Central and West India It will start from Jhansi krishi jagran Published on: 20 February 2024, 01:36 IST

Like this article?

Hey! I am ऋषिकेश चंद्रकांत काळंगे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters