1. बातम्या

शेतकऱ्यांनो पिके संभाळा! राज्यात अनेक ठिकाणी पाऊस, तर काही ठिकाणी पावसाची शक्यता..

सध्या विदर्भात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाने (Meteorology Department) दिलेल्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस राज्यात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांची धाकधूक वाढली आहे. यामुळे काही दिवस पिकांची काळजी घ्यावी लागणार आहे.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
rain maharashtra

rain maharashtra

सध्या विदर्भात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाने (Meteorology Department) दिलेल्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस राज्यात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांची धाकधूक वाढली आहे. यामुळे काही दिवस पिकांची काळजी घ्यावी लागणार आहे.

राज्यात सध्या पाऊस आणि थंडीचा खेळ आहे. दरम्यान, उत्तर महाराष्ट्रासह, उत्तर मराठवाड्यात थंडीचा कडाखा वाढला आहे. तसेच मुंबईतही (Mumbai) तापमानात घसरण झाल्यानं हुडहुडी वाढली आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक, जळगाव, धुळे या ठिकाणी पारा चांगलाच घरसला आहे. थंडीचा जोर वाढल्यानं ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या आहेत.

तसेच मराठवाड्यात देखील गारठा वाढला आहे. तसेच मुंबईचे किमान तापमान 15 अंशावर गेले आहे. जळगाव जिल्ह्यात थंडीची लाट आली आहे. तापमानाचा पारा 9 अंशावर गेला आहे. राज्यात नाशिक नगर पुणे औरंगाबाद, जालना, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया या आज ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे.

कर्नाटकमध्ये ऊस उत्पादकांना FRP पेक्षा 100 रुपये अधिक, महाराष्ट्र का नाही? आता राजू शेट्टी आक्रमक..

दरम्यान, राज्यातील तापमानात सातत्याने चढ उतार होत आहे. कुठे थंडीचा कडाका (Cold Weather) जाणवत तर कुठे ढगाळ वातावरणात आहे. यामुळे कधी पाऊस पडेल आणि कधी हवामान थंड होईल, हे देखील समजत नाही. अचानक वातावरणात बदल होत आहे.

ब्रेकिंग! महावितरण कर्मचाऱ्यांचा संप मागे, देवेंद्र फडणवीस यांची यशस्वी मध्यस्थी

तसेच मुंबईसह कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात त्यामुळे किमान तापमानात सरासरीपेक्षा तीन ते चार अंश सेल्सिअसने वाढ होवून थंडीचे प्रमाण कमी जाणवते. मुंबईसह कोकणात मात्र वातावरणात विशेष बदल जाणवणार नसून थंडीचा प्रभाव तिथे कायम असल्याची माहिती खुळे यांनी दिली. यामुळे येणारे काही दिवस महत्वाचे आहेत.

महत्वाच्या बातम्या;
बातमी कामाची! राज्य सरकार 5 लाख शेतकऱ्यांना देणार सोलर पंप, शेतकऱ्यांना होणार फायदा
कृषी जागरण आणि विजय सरदाना यांनी कृषी सुधारणेसाठी केला सामंजस्य करार
जगताप बंधूंनी माळरानावर फुलवली अंजिराची बाग, लागवडीपासून ते विक्रीपर्यंत सगळं काही ओक्के.

English Summary: Farmers take care crops state, chances rain some places Published on: 05 January 2023, 12:19 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters