1. बातम्या

शेतकऱ्यांनो पिकावर रासायनिक घटकांचे अवषेश कसे निर्माण होतात, जाणून घ्या..

रोग नियंत्रणासाठी आणि किड नियंत्रणासाठी वापर केल्या जाणा-या विविध बुरशीनाशकांच्याव किटकनाशकांच्या फवारणीतुन पिकावर रासायनिक अवशेष राहतात. या मधे निर्धारित प्रमाणा पेक्षा, आणि निर्धारित संख्ये पेक्षा जास्त वेळेस फवारणी होणे, या कारणामुळे पिकावरिल रासायनिक बुरशीनाशकांचे अवशेष प्रमाणापेक्षा जास्त दिसुन येतात.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
chemical elements on crops

chemical elements on crops

रोग नियंत्रणासाठी आणि किड नियंत्रणासाठी वापर केल्या जाणा-या विविध बुरशीनाशकांच्याव किटकनाशकांच्या फवारणीतुन पिकावर रासायनिक अवशेष राहतात. या मधे निर्धारित प्रमाणा पेक्षा, आणि निर्धारित संख्ये पेक्षा जास्त वेळेस फवारणी होणे, या कारणामुळे पिकावरिल रासायनिक बुरशीनाशकांचे अवशेष प्रमाणापेक्षा जास्त दिसुन येतात.

पिकाची अंतर्गत अशी अवशेष व्यवस्थापन यंत्रणेवर ताण पडल्याने देखिल रासायनिक घटकांचे अवशेष जास्त प्रमाणात दिसुन येतात.

३. पिकांस जमिनीतुन पाणी शोषुन घेत असतांना, जमिनीतील पाण्यातुन अशा रासायनिक घटकांची गरज नसतांना देखिल उपलब्धता होते.

पिकावरिल रासायनिक अवशेष कशा प्रकारे दुर केले जावु शकतात –
१. निर्धारित प्रमाणात आणि निर्धारित संख्ये नुसार बुरशीनाशक, किटकनाशक यांच्या फवारणी घेणे.

२. रासायनिक घटकांचे जमिनीवर होणारे आक्रमण थांबविण्यासाठी त्यांचा वापर करतांना ते फवारणीच्या पाण्यातुन जमिनीवर सांडणार नाही, उडणार नाही यासाठी योग्य अशा फवारणी यंत्राचा वापर करणे.

शिमला मिरचीने बदलले शेतकऱ्यांचे नशीब, लाखोंचा नफा

पिकाची स्वतःची अशी रासायनिक घटकांचे अवशेष दुर कऱण्याची व्यवस्था आणि वातावरणाचा परिणाम–
१. द्राक्ष पिकात विविध किटकनाशके आणि बुरशीनाशके यांचे विघटन करण्याची क्षमता आहे, या क्षमतेनुसारच विविध रासायनिक बुरशीनाशके आणि किटकनाशके यांचे पीएचआय तसेच एमआरएल पातळी काढल्या जात असतात.

२. पिकाची ज्यावेळेस वाढ होत असते, त्यावेळेस रासायनिक अवशेषांचे प्रमाण त्या तुलनेत पिकाच्या वाढीमुळे कमी होत जाते.

३. पिकाच्या पानांवर पडणा-या पाणी,दव, तसेच सुर्य प्रकाश यामुळे देखील रासायनिक घटकांचे विघटन होत असते.

४. पिकातील मेटाबोलिझम मधे देखिल रासायनिक घटकांचे विघटन होत असते.

५. या व्दारा होणारे विघटन हे अत्यंत कमी प्रमाणात आणि सावकाश असे असते.

शेतकऱ्यांनो दुग्ध व्यवसायातून पैसे कमावण्याची उत्तम संधी, नाबार्डकडून मिळतंय अनुदान

फळांवरिल रासायनिक घटकांच्या विघटनात, सर्वात मोठी आणि महत्वाची भुमिका ही मायक्रोबॅक्स चे बॅसिलस स्पे. गटातील जीवाणू पार पाडीत असतात. मायक्रोबॅक्स च्या सटलेक्स, विटाग्रो डिप तसेच ग्रोबॅक्स ह्या उत्पादना बॅसिलस गटातील विविध जीवाणू आहेत. ज्यांच्या वापरातुन फळातील रासायनिक बुरशी नाशक तसेच किटक नाशक ह्यांचे अवशेष कमी होण्यात मदत मिळते.

जमिनीत तसेच पानांच्या वर असणारे उपयुक्त जीवाणू समुह हे रासायनिक घटकांचे विघटन करुन त्यांचा वापर कार्बन, नत्र याचा स्रोत म्हणुन करतात. या गटात बॅसिलस, सुडोमोनास यांचा मोठा सहभाग असतो.

रासायनिक घटकांचे विघटन होते म्हणजे काय होते
१. विविध बुरशीनाशके आणि किटकनाशके यांचे जे अवशेष पिकावर तसेच जमिनीत शिल्लक राहतात त्यांनाच येथे आपण एक समान शब्द म्हणुन रासायनिक घटक असे म्हणत आहोत याची नोंद घ्यावी.

२. रासायनिक घटकांचे विघटन म्हणजे जीवाणूंच्या पेशीतुन स्व्रणा-या विविध घटकांमुळे, त्या रासायनिक घटकास ज्या गुणधर्मामुळे नाशकाची (बुरशी किंवा किटक नाशक) क्षमता प्राप्त होते, ती क्षमता नष्ट केली जाते.

महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांचा, रयतेचा राजा, राजा शिवछत्रपती, जाणून घ्या शिवकालीन शेतकऱ्यांसाठीची धोरण..
जमिनीएवढेच महत्त्व पाण्याच्या उत्पादकतेला, शेतकऱ्यांनो समजून घ्या..
ऊस उत्पादनाचा आलेख वाढवला, एकरी ८५ टनांवरून ११३ टनांपर्यंत उत्पादन

English Summary: Farmers, know how residues of chemical elements are formed on crops. Published on: 20 February 2023, 10:01 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters