1. बातम्या

होळीच्या दिवशी शेतकऱ्यांना कर्जमाफीची खास भेट, 34,788 शेतकऱ्यांना होणार लाभ

राज्याची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी विशेष अर्थसंकल्प सादर केला असून, त्यात त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
special loan waiver farmers Holi will benefit 34,788 farmers

special loan waiver farmers Holi will benefit 34,788 farmers

राज्याची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी विशेष अर्थसंकल्प सादर केला असून, त्यात त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक खास बातमी आहे. आता सर्व कर्जबाजारी शेतकर्‍यांची चिंता संपणार आहे.

भूमी विकास बँकेकडून कर्ज घेणाऱ्या राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. ज्यामध्ये सरकारचे म्हणणे आहे की या निर्णयामुळे राज्यातील सुमारे 34,788 शेतकऱ्यांचे 964.15 कोटी रुपयांचे कर्ज माफ होणार आहे. आता शेतकऱ्यांनी पिकांसाठी घेतलेले कर्ज सरकार भरणार आहे. शेतकऱ्यांच्या सोनेरी भवितव्यासाठी सरकारने सांगितले की, राज्याच्या अर्थसंकल्पानुसार सुमारे २७५ कोटी ४० लाख रुपयांची रक्कम भूविकास बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या देयकासाठी वापरली जाणार आहे.

अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री अजित पवार म्हणाले की, 2020 मध्ये पहिल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन देण्याची घोषणा केली होती, मात्र आर्थिक अडचणींमुळे ही रक्कम वितरित होऊ शकली नाही. याशिवाय त्यांनी राज्यातील शेतकर्‍यांचे आभार मानले आणि शेतकर्‍यांची आर्थिक स्थिती सुधारण्याचे त्यांनी दिलेले वचन पूर्ण होत असल्याचे सांगितले.

यासोबतच राज्यातील सुमारे 20 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार असल्याचे ते सांगतात. त्याचवेळी अर्थमंत्री अजित पवार म्हणाले की, 2022-23 या वर्षात 43.12 लाख शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजावर 911 कोटी रुपयांची सुविधा दिली जाईल. यामुळे याचा अनेक शेतकऱ्यांना थेट फायदा होणार आहे. गेला काही दिवसांपासून शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. यामुळे त्यांना दिलासा देण्यासाठी अनेक निर्णय घेण्यात आले आहेत.

महत्वाच्या बातम्या:
“शेतकऱ्यांच्या जमिनीवर धरणे बांधून वीजनिर्मीती केली पण त्याच शेतकऱ्यांना आज वीज मिळत नाही”
शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश! वीज तोडणी त्वरीत थांबवण्याची ठाकरे सरकारची घोषणा, तोडलेली वीजही जोडणार

 

English Summary: A special loan waiver for farmers on the day of Holi will benefit 34,788 farmers Published on: 15 March 2022, 05:02 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters