Weather

यावर्षी पावसाने जो काही महाराष्ट्रमध्ये धुमाकूळ घातला तो अद्याप पर्यंत चालूच असून अजून देखील महाराष्ट्रमध्ये भरपूर ठिकाणी पाऊस झाल्यामुळे जे काही शिल्लक पिके होती त्यांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. राज्यामध्ये बहुतांश जिल्ह्यात अतिवृष्टी सारखा पाऊस होत आहे त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून महाराष्ट्रातील बऱ्याच भागांमध्ये जोरदार पाऊस पडत आहे. जर आपण कालचा विचार केला तर महाराष्ट्रातील बहुतांशी भागात अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाला.

Updated on 18 October, 2022 3:23 PM IST

यावर्षी पावसाने जो काही महाराष्ट्रमध्ये धुमाकूळ घातला तो अद्याप पर्यंत चालूच असून अजून देखील महाराष्ट्रमध्ये भरपूर ठिकाणी पाऊस झाल्यामुळे जे काही शिल्लक पिके होती त्यांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. राज्यामध्ये बहुतांश जिल्ह्यात अतिवृष्टी सारखा पाऊस होत आहे त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून महाराष्ट्रातील बऱ्याच भागांमध्ये जोरदार पाऊस पडत आहे. जर आपण कालचा विचार केला तर महाराष्ट्रातील बहुतांशी भागात अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाला.

नक्की वाचा:50 हजार प्रोत्साहनपर लाभ योजनेचा २० ऑक्टोबरपासून शुभारंभ, सहकारमंत्र्यांची माहिती..

जर आपण कालचा विचार केला तर काल नाशिक जिल्ह्याच्या बऱ्याच भागांमध्ये पावसाने जोरदार धुमाकूळ घातला. या दरम्यान भारतीय हवामान विभागाने आज कोकण, पश्चिम महाराष्ट्रा तसेच विदर्भ आणि मराठवाडा या चारही विभागांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे.

जर आपण भारतीय हवामान विभागाचा अंदाज पहिला तर कोल्हापूर जिल्ह्यात तसेच इतर नऊ  जिल्ह्यात पावसाची शक्यता असून यामध्ये कोकण विभागातील सिंधुदुर्ग,रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यात तसेच राजधानी मुंबई व पुणे,सातारा इत्यादी ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे.

नक्की वाचा:Maharashtra Rain: महाराष्ट्रात पावसाची जोरदार बॅटिंग! अनेक ठिकाणी धो धो कोसळला, आजही अतिवृष्टीचा इशारा

काय म्हणतो पंजाबरावांचा हवामान अंदाज?

 शेतकऱ्यांमध्ये विश्वासाचे स्थान निर्माण केलेले पंजाबराव डख यांचा देखील हवामान अंदाज समोर आला असून त्यांच्यामते 19 तारखेपासून महाराष्ट्र मध्ये पावसाची उघडीप होणार असून आज महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांत स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. म्हणजेच उद्याचा दिवस हा पावसाचा राहणार आहे. तसेच 19 तारखेपासून राज्यात थंडीला सुरुवात होणार असल्याची माहितीदेखील पंजाबराव यांनी दिली आहे.

तसेच येणाऱ्या 22 आणि 23 ऑक्टोबर रोजी राज्यातील सातारा,सांगली आणि कोल्हापूर या द्राक्षपट्ट्यात पावसाची शक्यता असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

या पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून सोयाबीन आणि कापूस पिकाची काढणी सुरू आहे. परंतु आता या परतीच्या पावसाने जो काही धुमाकूळ घातला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

नक्की वाचा:शासनाचे पंचनाम्याचे आदेश म्हणजे शेतकऱ्यांनच्या जखमेवर मिट चोळण्या सारखे- गोपाल तायडे

English Summary: this is important meterological guess of punjabrao dakh for rain in some part in maharashtra
Published on: 18 October 2022, 03:23 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)