Weather

Today weather update : मागील दोन दिवसांपासून राज्यातील तापमानात चांगलीच घट झाल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. त्यामुळे राज्यात थंडीचा जोर वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. तसंच पुढील तीन ते चार दिवस ही थंडी कायम राहण्याचा अंदाज देखील हवामान खात्याने दिला आहे. येत्या काही काळात उत्तर आणि मध्य महाराष्ट्रामध्ये थंडीचा कडाका वाढणार असल्याचंही हवामान खात्याने म्हटलं आहे.

Updated on 18 January, 2024 9:57 AM IST

Weather News : उत्तर भारतात थंडीचा कायम अद्यापही कायम आहे. याचबरोबर राज्यातील तापमानात देखील त्याचा परिणाम झाला आहे. राज्यातील तापमानात घट झाल्याने राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. हा थंडीचा जोर पुढे कायम राहण्याचा अंदाज देखील हवामान खात्याने दिला आहे. बुधवारी जळगावात ९ अंशांच्या किमान तापमानाची नोंद झाली तर राज्याच्या काही भागांमध्ये मात्र किमान तापमान अंशत: वाढलं आहे.

राज्यात थंडीचा जोर वाढला

मागील दोन दिवसांपासून राज्यातील तापमानात चांगलीच घट झाल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. त्यामुळे राज्यात थंडीचा जोर वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. तसंच पुढील तीन ते चार दिवस ही थंडी कायम राहण्याचा अंदाज देखील हवामान खात्याने दिला आहे. येत्या काही काळात उत्तर आणि मध्य महाराष्ट्रामध्ये थंडीचा कडाका वाढणार असल्याचंही हवामान खात्याने म्हटलं आहे.

दक्षिण कर्नाटक आणि विदर्भादरम्यान वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे हवेतील आर्द्रता घटली आहे. याचबरोबर उत्तर भारतात थंडीची लाट कायम आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात पुढील चार-पाच दिवस थंडीचा जोर कायम राहणार आहे.

सध्या उत्तर पुणे जिल्ह्याच्या शिरूर, आंबेगाव, खेड, जुन्नर भागात धु्क्याची चादर पाहायला मिळत आहे. सततच्या ढगाळ हवामानामुळे शेतकरी पुन्हा चिंतेत आहेत. ढगाळ वातावरण निवळल्यानंतर शेतकऱ्यांची चिंता देखील मिटणार आहे.

दरम्यान, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, उत्तर मध्य प्रदेश, बिहार, झारखंड या भागातील तापमान ६ ते १० अंशाच्या दरम्यान राहिल्याची नोंद हवामान खात्याने केली आहे. पंजाबमधील अमृतसर येथे सर्वांत निच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

English Summary: Maharashtra Weather Update Drop in temperature in the state The cold got worse
Published on: 18 January 2024, 09:57 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)