Success Stories

मित्रांनो आपला भारत हा कृषिप्रधान देश आहे, ही गोष्ट आपणा सर्वांना माहीत आहे, शिवाय आपण देखील मोठ्या रुबाबात याचं बखान करत असतो. मात्र स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतरही आपल्या देशातील तरुण शेतीला फायदेशीर व्यवहार मानत नाहीत, तर दुसरीकडे असे अनेक लोक आहेत जे प्रतिकूल परिस्थितीत यश मिळवत आहेत शिवाय अनेकांना प्रेरणा देखील देत आहेत.

Updated on 14 May, 2022 5:12 PM IST

मित्रांनो आपला भारत हा कृषिप्रधान देश आहे, ही गोष्ट आपणा सर्वांना माहीत आहे, शिवाय आपण देखील मोठ्या रुबाबात याचं बखान करत असतो. मात्र स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतरही आपल्या देशातील तरुण शेतीला फायदेशीर व्यवहार मानत नाहीत, तर दुसरीकडे असे अनेक लोक आहेत जे प्रतिकूल परिस्थितीत यश मिळवत आहेत शिवाय अनेकांना प्रेरणा देखील देत आहेत.

आम्ही तुम्हा सर्वांना कळवू इच्छितो की, जर तुम्ही मेहनत आणि सर्वस्वी झोकून देऊन शेती केली तर निश्चितच तुम्हाला यातून चांगला बक्कळ नफा मिळू शकतो. 

आज आम्ही तुम्हाला अशा एका व्यक्तीबद्दल सांगणार आहोत जो शेती करून लाखों नहीं तर करोडो रुपयांची कमाई करत आहे. यासोबतच मोठ्या संख्येने लोकांना रोजगारही उपलब्ध करून देत आहे, चला तर मग जाणून घेऊया त्या व्यक्तीची यशोगाथा.

कोण आहे हा अवलिया शेतकरी 

आपल्या माहितीसाठी, आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की राकेश चौधरी हे मूळचे राजस्थानच्या नागौर जिल्ह्यातील राजपूर गावचे रहिवासी आहेत.

एका कार्यक्रमादरम्यान राकेश चौधरी म्हणाले की, सर्व पालकांप्रमाणेच त्यांच्या पालकांनाही त्यांच्या मुलाने सरकारी नोकरी करावी अशी इच्छा होती.

मात्र राकेशला सुरुवातीपासूनच शेती करायची इच्छा होती, त्यामुळे जयपूरमधील महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो गावी परतला आणि शेती करू लागला.

औषधी वनस्पतींच्या लागवडीपासून सुरुवात

राकेश सांगतात की, जेव्हा तो कॉलेजमध्ये शिकत होता, तेव्हा त्याच्या एका ओळखीच्या व्यक्तीने औषधी वनस्पती लावण्यासाठी एक संस्था चालवणाऱ्या व्यक्तीशी त्याची ओळख करून दिली आणि त्यादरम्यान लोकांना औषधी वनस्पतींची लागवड करण्यासाठी प्रोत्साहन दिले.

यासोबतच सरकार द्वारे शेतकऱ्यांना अनुदानही देण्यात आले. राकेश सांगतात की, ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यावर 2004 मध्ये त्याला औषधी वनस्पती मंडळात प्रवेश मिळाला आणि त्याअंतर्गत तो औषधी वनस्पतीची पूर्णपणे लागवड करायला शिकला.

राकेश सांगतात की, 2005 मध्ये त्यांनी आपल्या भागातील काही लोकांना औषधी वनस्पती लागवडीसाठी प्रवृत्त केले, लोक तयार झाले पण पहिल्या पिकात त्यांना तोटा सहन करावा लागला, यादरम्यान मला लोकांकडून खूप कटू शब्द ऐकायला मिळाले. पण तरीही मी हार मानली नाही.

या पद्धतीने सुरु केली कंत्राटी शेती

राकेश चौधरी सांगतात की, जेव्हा त्यांनी पहिल्यांदा शेती केली तेव्हा त्यांनी हवामानाकडे लक्ष दिले नाही आणि त्याचा फटका त्यांना सहन करावा लागला, दुसऱ्यांदा त्यांनी हवामानाची काळजी घेतली आणि राजस्थानचे हवामान पाहता, त्याने कोरफडीची लागवड केली.

यादरम्यान राकेशने लोकांना औषधी शेतीशी जोडण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचा अवलंब केला. त्यादरम्यान त्यांनी लोकांना सांगितले की जमीन तुमची असेल पण पिकाचे सर्व साहित्य राकेशचे असेल.

शेती आणि पीक त्याच्या मार्केटिंगची जबाबदारी राकेशची असेल, राकेश सांगतो की, शेतकऱ्यांनी होकार दिला असला तरी त्यांच्यासमोर त्यावेळी भांडवलाचा प्रश्न निर्माण झाला होता.

कर्ज घ्यावे लागले

राकेश सांगतात की, औषधी वनस्पती लावणीचे साहित्य घेण्यासाठी पैशांची नितांत गरज होती, त्यासाठी त्यांनी त्याच्या पत्नीचे दागिने गहाण ठेवून बँकेतून कर्ज घेतले, या काळात त्यांनी काही शेतकर्‍यांसह कोरफडीची लागवड केली.

पीक चांगले आले, पण नंतर त्याला अडचणीचा सामना करावा लागला. मार्केटिंगमध्ये खूप अडचणी येत होत्या, परंतु काही काळानंतर एका कंपनीने त्यांची सर्व पिके विकत घेतली आणि अशा प्रकारे शेती व्यवसायात त्यांच्या यशाची सुरवात झाली.

आता वार्षिक 10 कोटींची उलाढाल आहे

राकेश चौधरी सांगतात की, पहिलं यश पाहून आणखी अनेक शेतकरी त्यांच्यात सामील झाले आणि दुसऱ्यांदा त्यांना अतिशय उच्च दर्जाचं पीक झालं. त्यांच्या गावातील 90 हून अधिक महिलांना यामुळे रोजगारही मिळाला.

राकेश सांगतात की, आज अनेक भागातील शेतकरी त्यांच्यासोबत जोडले गेले आहेत आणि त्यांनी हर्बल फार्म नावाची कंपनी सुरू केली आहे, राकेशच्या या कंपनीची वार्षिक उलाढाल आता 10 कोटी आहे.

राकेश पुढे बोलतांना सांगतात की, आता ते मोठ्या कंपन्यांसोबत काम करत आहेत आणि 2022 पर्यंत त्यांना 100 कोटींची उलाढाल होण्याची आशा आहे.

English Summary: This is called success! A change made in agriculture and now earning Rs 10 crore a year; Learn this abandonment experiment
Published on: 12 May 2022, 04:26 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)