Success Stories

गेल्या अनेक वर्षांपासून पिकांसाठी रासायनिक खतांचा अनिर्बंध वापर केला जातं आहे, यामुळे जमिनीचा पोत ढासळला गेला आहे तसेच रासायनिक खतांचा वापरामुळे तयार होणारी उत्पादने मानवी शरीरासाठी खूपच घातक असतात. त्यामुळे केंद्र सरकार तसेच अनेक राज्य सरकारे शेतकरी बांधवांना जैविक शेतीसाठी प्रेरित करीत आहेत. अनेक शेतकरी बांधवांनी स्वतःच शेती क्षेत्रात आमूलाग्र बदल करून जैविक शेती करायला सुरुवात केली आहे. हरियाणा राज्यातील एक शेतकरी देखील जैविक शेती करीत आहेत, तसेच जैविक शेतीसाठी लागणारे खतांची निर्मिती देखील स्वतः करीत आहेत.

Updated on 16 February, 2022 8:48 PM IST

गेल्या अनेक वर्षांपासून पिकांसाठी रासायनिक खतांचा अनिर्बंध वापर केला जातं आहे, यामुळे जमिनीचा पोत ढासळला गेला आहे तसेच रासायनिक खतांचा वापरामुळे तयार होणारी उत्पादने मानवी शरीरासाठी खूपच घातक असतात. त्यामुळे केंद्र सरकार तसेच अनेक राज्य सरकारे शेतकरी बांधवांना जैविक शेतीसाठी प्रेरित करीत आहेत. अनेक शेतकरी बांधवांनी स्वतःच शेती क्षेत्रात आमूलाग्र बदल करून जैविक शेती करायला सुरुवात केली आहे. हरियाणा राज्यातील एक शेतकरी देखील जैविक शेती करीत आहेत, तसेच जैविक शेतीसाठी लागणारे खतांची निर्मिती देखील स्वतः करीत आहेत.

हा शेतकरी जैविक शेतीसाठी आवश्यक वर्मी कंपोस्ट स्वतः तयार करीत आहे तसेच आजूबाजूच्या पंचक्रोशीत हा शेतकरी वर्मी कंपोस्ट सुद्धा विक्री करत आहे. रेवाडी जिल्ह्यातील मौजे नांगल मुंदी गावातील रहिवासी शेतकरी कुलजीत यादव मागील दोन वर्षांपासून वर्मी कंपोस्ट अर्थात गांडूळ खत निर्मिती करून त्याच्या विक्रीतून चांगला मोठा नफा कमवीत आहेत. कुलजीत परराज्यात देखील गांडूळ खताची विक्री करत आहेत. हरियाणा, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात व हिमाचल प्रदेश आणि देशातील इतरही राज्यांत यादव यांचे गांडूळ खत विक्री होत असते. यादव गांडूळ खत विक्री करतात तसेच अनेक शेतकऱ्यांना गांडूळखत निर्मितीचे प्रशिक्षण देखील देत असतात.

गांडूळ खत विक्रीतून कुलजीत यादव महिन्याला दीड लाख रुपये कमवीत असल्याचे सांगितले जात आहे.

युरियाच्या वापरामुळे जमिनीचे उत्पादन कमी होण्याबरोबरच लोकांचे आरोग्यही दिवसेंदिवस बिघडत असून, आता सेंद्रिय शेती करून त्यात सुधारणा करता येऊ शकते, असे शेतकरी कुलजीत यादव सांगतात. ही माहिती देशातील इतर शेतकऱ्यांना दिल्याने मनाला दिलासा मिळतो. सेंद्रिय शेतीसाठी गांडूळ खत बनवण्याबरोबरच, येथे देशी कीटकनाशक देखील तयार केले जाते, ज्यामुळे पिकावरील रोग आणि फुलांचे नुकसान यांसारख्या समस्यांसह पिकाचे उत्पादन वाढते.

या कीटकनाशकाच्या तयारीसाठी, कडुनिंब, दातुरा, कॅनर, सदाहरित, कोरफड, तंबाखू, लाल किंवा हिरवी मिरची, कातेली, आस्कन आणि एरंडीच्या पानांसह 35 प्रकारच्या औषधी वनस्पतींचे मिश्रण करून एक द्रव स्प्रे तयार केला जातो आणि या स्प्रेची पिकांवर फवारणी केली जाते. या किटकनाशकाची एक बाटली 30 लिटर पाण्यात मिसळून पिकांना फवारल्यास पिकांचे उत्पादन वाढण्यास मदत होते.

English Summary: By producing organic manure at home, this farmer earns Rs. 1.5 lakh per month
Published on: 16 February 2022, 08:48 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)