Success Stories

देशातील शेतकरी बांधव आता उत्पादनवाढीच्या अनुषंगाने शेती क्षेत्रात मोठा बदल करीत आहेत. शेती मध्ये दिवसेंदिवस होत असलेल्या बदलांमुळे शेतकरी बांधवांना चांगला फायदा मिळत आहे. शेतकरी बांधव आता पारंपरिक पद्धतीला बगल देत मागणी मध्ये असलेल्या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड करत आहेत.

Updated on 28 March, 2022 10:14 PM IST

देशातील शेतकरी बांधव आता उत्पादनवाढीच्या अनुषंगाने शेती क्षेत्रात मोठा बदल करीत आहेत. शेती मध्ये दिवसेंदिवस होत असलेल्या बदलांमुळे शेतकरी बांधवांना चांगला फायदा मिळत आहे. शेतकरी बांधव आता पारंपरिक पद्धतीला बगल देत मागणी मध्ये असलेल्या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड करत आहेत.

बाजारपेठेत ज्या पिकाला अधिक मागणी असते त्या पिकांची लागवड करून शेतकरी बांधव चांगले उत्पन्न प्राप्त करीत आहेत. आज आपण अशा एका शेतकऱ्याविषयीं जाणून घेणार आहोत ज्याने बाजारपेठेतील मागणी बघता लसूण पिकाची लागवड करून चांगले दर्जेदार उत्पादन प्राप्त केले आहे.

आज आपण बलराज सिंह जाखड या प्रयोगशील शेतकरीविषयी जाणून घेणार आहोत. बलराज हे भुतान खुर्द गावात आपल्या दोन भावांसह राहतात. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, बलराज सिंह जाखड यांच्याकडे 14 एकर शेत जमीन आहे. ते त्यांच्या 14 एकर जमिनीवर लसणाची लागवड करतात.  2014 पासून ते त्यांच्या शेतात लसणाची लागवड करत आहेत. बलराज त्याच्या संपूर्ण लागवडीखालील जमिनीवर लसणाची लागवड करतो. याशिवाय बलराज करारावर 5 एकर शेतजमीन घेऊन घरासाठी गव्हाची लागवड करतो.

शेतकरी बलराज सिंह जाखड़ सांगतात की, त्यांचे भाऊ मंगल सिंह आणि सुभाष हे देखील त्यांना शेतीत मदत करतात. त्यांना 14 एकर शेतातून 40 ते 60 क्विंटलपर्यंत लसणाचे उत्पादन मिळते. बाजारात याची किंमत 100 रुपये प्रतिकिलो पर्यंत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना लसणापासून 5 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते.

बलराज यांच्या मते, गहू सारख्या पारंपरिक पिकाच्या लागवडीवर हजारो रुपये खर्च करूनही शेतकरी बांधवांना चांगला नफा मिळत नाही.  त्यामुळे देशातील अनेक शेतकरी बांधव आता पारंपरिक पिकांची शेती सोडून इतर शेतीचा अवलंब करून नफा कमवत आहेत. शेतकरी बलराज सिंह यांच्या लसणाच्या लागवडीतून होणारा नफा पाहून गावातील इतर शेतकऱ्यांनीही आपल्या शेतात लसणाची लागवड करण्यास सुरुवात केली.

बलराज जाखड सांगतात की, बाजारात लसणाच्या दरात नेहमी चढ-उतार होत असतो. बाजारात लसणाची किंमत जास्त असेल तर कर्नाल आणि जयपूरमध्ये बलराज आपला लसूण विकत असतो. लसणाच्या दरात घसरण झाल्यास ते हिस्सार किंवा फतेहाबादला लसूण विक्रीसाठी पाठवतात. लसणाचे चांगले उत्पादन घेण्यासाठी लोकांनी कोंबडी खताचा वापर करावा असेही शेतकरी बलराज सांगतात. कोंबडी खताचा वापर केल्याने शेतकरी बांधव लसूण लागवडीतून 60 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळवू शकतो.

संबंधित बातम्या:-

युवा शेतकऱ्याचे कलिंगड दुबई रवाना! पाणीटंचाईवर मात करीत फुलवली कलिंगडची शेती

वावर है तो पॉवर है! विदेशातली नौकरी सोडून करतोय शेती, आज लाखोंची उलाढाल

English Summary: By cultivating garlic, this farmer earns Rs. 5 lakhs
Published on: 28 March 2022, 10:14 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)