News

सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असल्यामुळे शेतात असलेल्या पिकांना वेळेत पाण्याचा पुरवठा होण्याची नितांत गरज आहे. एवढ्या उन्हाच्या तडाख्यात जर पिकांना वेळेवर पाणी मिळाले नाही तर पिके करपून जाण्याची दाट शक्यता आहे.

Updated on 18 April, 2022 7:57 PM IST

सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असल्यामुळे शेतात असलेल्या पिकांना वेळेत पाण्याचा पुरवठा होण्याची नितांत गरज आहे. एवढ्या उन्हाच्या तडाख्यात जर पिकांना वेळेवर पाणी मिळाले नाही तर पिके करपून जाण्याची दाट शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर इटियाडोह पाटबंधारे विभाग व पाणी वापर संस्थांनी या परिसरातील म्हणजेच अरसोडा व पालोरा, आरमोरी इत्यादी परिसरातील शेतकऱ्यांना धान पिकाला पाणी देण्यात येईल अशा पद्धतीचा निर्णय घेण्यात आला होता.

नक्की वाचा:पशुपालकांसाठी उभारण्यात आलेल्या दूधवाणी कम्युनिटी रेडिओ स्टेशनचे उद्या नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

परंतु पंधरा ते वीस दिवस उलटून देखील  इटियाडोह पाटबंधारे विभाग डोळे लावून बसलेला होता व आता धान पिकाला नितांत पाण्याची गरज होती त्यामुळे हे पीक धोक्यात आले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी नाईलाजास्तव आंदोलन करण्याचा निर्णय घेतला  पण लागलीच पाटबंधारे विभागाला जाग आल्यासारखे प्रकल्पातील पाणी सोडले.

त्यामुळे या परिसरातील धान उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे. यावर्षी अगोदरच इटियाडोह पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांना पिकांना पाणी मिळेल असे सांगून पाण्याची वसूल केले होते. या आश्वासनामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उन्हाळी धान पिकाची पेरणी केली. परंतु आता या पिकाला पाण्याची मोठ्या प्रमाणात गरज असताना देखील पाणी सोडण्यात येत नव्हते. शेतात उभे असलेले धान पीक करपण्याच्या मार्गावर होते. शेतकऱ्यांनी या विभागाला वारंवार पाणी सोडण्याची विनंती केली तरीदेखील पाणी सोडण्यात येत नव्हते त्यामुळे शेतकरी एकतर पाणी द्यावे किंवा नुकसानभरपाई द्या अशा पद्धतीची मागणी शेतकरी करीत होते.

नक्की वाचा:Post Office Savings Scheme : पोस्ट ऑफिस योजनेतून कमी व्याजदरात मिळवा कर्ज; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

जर पाणी सोडण्यात आले नाही तर रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा संतप्त शेतकऱ्यांनी दिला होता. या सगळ्या प्रकाराची दखल घेत इटियाडोह पाटबंधारे विभागाने तात्काळ पाणी सोडल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे व या परिसरात असलेल्या शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या तीनशे एकर पेक्षा जास्त धान पिकाला जीवदान मिळाले आहे.

English Summary: water realese from itihadoh water project for paddy crop in aarmora and palora
Published on: 18 April 2022, 07:57 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)