News

पाण्याअभावी ऊस हंगामावर संकट निर्माण होण्याची चिन्हे आहेत. कारण गत हंगामाच्या तुलनेने २६६ लाख टनांनी गाळप कमी होऊन साखरेचे उत्पादन ३२ लाख टनांनी कमी झालेले आहे.

Updated on 01 September, 2023 1:16 PM IST

पुणे

जून आणि जुलैमहिन्यात देखील पावसाने कमी प्रमाणात हजेरी लावली आहे. त्यामुळे आगामी २०२३-२४ च्या ऊस गाळपावर दुष्काळाचे संकट आहे. त्यामुळे पाण्याअभावी ऊस पिकाचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे याचा परिणाम ऊस गाळपावर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

येत्या साखर हंगामाबाबत संबंधित शिखर संस्थांकडून कारखानदारीची मते जाणून घेतल्यानंतर शासन स्तरावर योग्य ते निर्णय घेतले जातील. तसेच साखरेच्या एमएसपीमध्ये ३ हजार ७२० रुपये वाढ करावी, अशी मागणी केंद्र सरकारकडे करणार असल्याची माहिती सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

वसंतदादा साखर संस्थेत राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाच्या वतीने शनिवारी (दि.१२) रोजी आयोजित करण्यात आलेला चर्चासत्रात दीपक वळसे पाटील बोलत होते. 

यावेळी वळसे पाटील म्हणाले की, "पाण्याअभावी ऊस हंगामावर संकट निर्माण होण्याची चिन्हे आहेत. जून-जुलैमध्ये पाऊस झालेला नाही. धरणासाठा देखील कमी असून, पाण्याच्या आवर्तनाचे देखील नियोजन करावे लागणार आहे. त्यादृष्टीने सरकार काम करीत असून, साखर हंगामाबाबत नैसर्गिक घडामोडींवर सरकार लक्ष ठेवून आहे."

English Summary: Water crisis during this year's sugarcane crushing season What will the government do
Published on: 14 August 2023, 10:43 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)