News

शेतात एक कोटी रुपयांचे टोमॅटोचं पीक शिल्लक आहे. संततधार पावसामुळे पिकाचं नुकसान होणार असल्याने त्यांना पिकाची काळजी वाटत आहे.

Updated on 01 September, 2023 4:45 PM IST

मुंबई

टोमॅटोचे भाव वाढल्याने गृहणींच आर्थिक बजेट कोलमडले आहे. मात्र टोमॅटो उत्पादक शेतकरी मिळणाऱ्या भावामुळे करोडपती झाले आहे. काही उत्पादक शेतकऱ्यांचे टोमॅटोमुळे नशीब बदले आहे. देशात टोमॅटोचे यंदा उत्पादन कमी झाल्यामुळे टोमॅटोला चांगला दर मिळाला आहे. काही भागात १०० ते १५० किलोचा भाव टोमॅटोला मिळत आहे.

तेलगंणातील मेडक जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने टोमॅटोचे पीक घेतले आहे. नेमके दर वाढलेले असतानाचा टोमॅटो काढणीला आल्याने हा शेतकरी चांगलाचा मालामाल झाला आहे. मेडक जिल्ह्यातील कौडीपल्ली मंडलातील मोहम्मद नगर गावातील बी महिपाल रेड्डी असं या शेतकऱ्याचं नाव आहे. महिपाल रेड्डी आधी त्यांच्या २० एकर शेतजमिनीवर भातशेती करायचे. पण, त्यानंतर त्यांनी टोमॅटोची शेती करण्याचा निर्णय घेतला आणि यामुळे जणू त्यांच्या आयुष्यालाच कलाटणी मिळाली आहे.

पीटीआय वृत्तसंस्थेला माहिती देताना महिपाल रेड्डी म्हणाले की, शेतात एक कोटी रुपयांचे टोमॅटोचं पीक शिल्लक आहे. संततधार पावसामुळे पिकाचं नुकसान होणार असल्याने त्यांना पिकाची काळजी वाटत आहे. रेड्डी यांनी स्वतःची २० एकर जमीन सोडून त्यांनी ८० एकर भाडेतत्त्वावर घेतली असून ६० एकरमध्ये भातशेती केली आहे आणि उर्वरित जमिनीवर ते इतर पिके घेतात.

English Summary: Tomatoes make farmers millionaires There are still crores worth of tomatoes left but
Published on: 27 July 2023, 03:31 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)