News

लातूर जिल्ह्यात बियाणे न उगवल्याच्या २२० शेतकऱ्यांनी तक्रारी दाखल झाल्या आहेत. बीडच्या अंबाजोगाईतील ६० तक्रारी दाखल झाल्या आहेत. तर उस्मानाबाद जिल्ह्यात देखील ३६ तक्रारी कृषी विभागाकडे दाखल झाल्या आहेत.

Updated on 01 September, 2023 5:21 PM IST

छत्रपती संभाजीनगर

मराठवाड्यातील लातूर, बीड, उस्मानाबाद आणि छत्रपती संभाजीनगरमधील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. बोगस बियाण्यांमुळे शेतकरी संकटात आले आहेत. पेरणी नंतर बियाण्यांची उगवण झाली नसल्याच्या तक्रारी आता कृषी विभागाकडे प्राप्त होण्यास सुरुवात झाली असल्याने पंचनामे सुरु झाले आहेत. 

लातूर जिल्ह्यात बियाणे न उगवल्याच्या २२० शेतकऱ्यांनी तक्रारी दाखल झाल्या आहेत. बीडच्या अंबाजोगाईतील ६० तक्रारी दाखल झाल्या आहेत. तर उस्मानाबाद जिल्ह्यात देखील ३६ तक्रारी कृषी विभागाकडे दाखल झाल्या आहेत.

छत्रपती संभाजीनगरमधील सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना वितरण करण्यात आलेल्या सिंगल सुपर फॉस्फेट या खतांचे नऊ नमुने अप्रमाणित असल्याचा अहवाल नाशिक येथील प्रयोगशाळेकडून शनिवारी रात्री देण्यात आला. 

दरम्यान, कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील बोगस बियाणाचा फटका बसला आहे. अंबाजोगाईमध्ये आधीच एक महिना उशिरा पेरणी झाली आहे. त्यातच आता पेरलेले बियाणे उगवून न आल्याने शेतकरी संकटात सापडले आहे.

English Summary: Time for double sowing on Marathwada farmers
Published on: 25 July 2023, 01:29 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)