News

मुंबई- शेती हा तोट्याचा व्यवसाय मानला जातो. नापिकी, अतिवृष्टी, कमी बाजारभाव यासह एकाधिक संकटे आपल्याला शेतकऱ्यांसमोर पाहायला मिळतात. स्मार्ट पद्दतीने शेतीतून आपल्या यशाचा मार्ग निर्माण करणारे काही शेतकरीही आहेत.

Updated on 21 October, 2021 10:34 AM IST

मुंबई-  शेती हा तोट्याचा व्यवसाय मानला जातो. नापिकी, अतिवृष्टी, कमी बाजारभाव यासह एकाधिक संकटे आपल्याला शेतकऱ्यांसमोर पाहायला मिळतात. स्मार्ट पद्दतीने शेतीतून आपल्या यशाचा मार्ग निर्माण करणारे काही शेतकरीही आहेत. 

1. प्रमोद गौतम 

ऑटोमोबाईल श्रेत्रातील नामांकित व्यक्तिमत्व असलेल्या प्रमोद गौतम यांनी 2006 मध्ये शेती व्यवसायास प्रारंभ केला. प्रयोगशाली शेतीची कास धरणारे गौतम यांचा वर्षाला कोटी रुपयांचा टर्नओव्हर आहे. सुरूवातीच्या टप्प्यात प्रमोद यांनी भुईमूग आणि हळदीच्या शेतीचा प्रयोग केला. मात्र, पुरेशा प्रमाणात त्यांना महसूल प्राप्त झाला नाही.

प्रमोद गौतम यांना मजूरांची कमतरता भासली. त्यावेळी त्यांनी ड्रायव्हर विरहित चालणाऱ्या ट्रॅक्टरचा आपल्या शेतात उपयोग केला. महागडी उपकरणेच वापरायला हवी यामताचे गौतम नाहीत. शेतकऱ्यांना बाजारपेठेचं आकलन असल्यास अधिक नफा मिळू शकतो असे गौतम यांचे म्हणणे आहे.

संत्री, पेरु, लिंबू, तूर दाळ यांच्या उत्पादनास सुरुवात केली. विशेष म्हणजे प्रमोद यांनी शेतातच निर्मिती उद्योगांना सुरुवात केली. त्यामुळे शेतीपूरक उत्पादनातून त्यांना उत्पन्नाचा नवा मार्ग गवसला.  

2. सचिन काळे (Sachin Kale)

शिक्षणाने मेकॅनिकल इंजिनिअर असलेल्या सचिन काळे यांची आज प्रतिथयश शेतकऱ्यांमध्ये होते. एका नामांकित कंपनीत मॅनेजर पदावरील नोकरीचा त्याग करुन सचिन यांनी शेतीची वाट धरली. वार्षिक 24 लाखांच्या नोकरीचा त्याग करून मेधपूर येथे शेतकरी म्हणून आयुष्य सुरु केले. 

शेतीविषयी काहीही कल्पना नसलेल्या सचिन यांनी पेरणी पासून काढणीपर्यंत सर्व कामे स्वत: शिकली. सचिन यांनी करार पद्धतीच्या शेतीचे नवे मॉडेल उभारले. आज जवळपास 100 हून अधिक शेतकरी कुटूंबांना आर्थिक उत्पन्नाचा नवा मार्ग गवसला आहे. वर्षाकाठी 2 कोटी रुपयांचे आर्थिक उत्पन्न सचिन आपल्या शेतीतून मिळवतात.

 3. हरीश धनदेव (Harish Dhandev)

सरकारी नोकरीमधील सुखासीन आयुष्याचा त्याग करुन स्वत:ला सिद्ध करणाऱ्या हरीश धनदेवांची गणना श्रीमंत शेतकऱ्यांमध्ये होते. राजस्थानच्या मरुभूमीत को

रफडीच्या उत्पादनाला सुरुवात केली. ऑनलाईन माध्यमातून तसेच तज्ज्ञ शेतकऱ्यांसोबत संवाद साधून हरीश यांनी कोरफड लागवडीचे तंत्रज्ञान अवगत केले. यावेळी कोरफडची मागणी केवळ स्थानिक बाजारपेठेत नसून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील स्थान त्यांच्या लक्षात आले. केवळ सहाच महिन्यात 80 हजार झाडांवरुन 6 लाख झाडांपर्यंत पोहोचले.

हरीश यांना केवळ राजस्थानातूनच दहा क्लायंट मिळाले. मात्र, कोरफड मधील गर काढून अधिक किंमतीत विक्री करत असल्याचे त्यांना आढळून आले. तेव्हा त्यांनी स्वत: निर्मिती प्रक्रिया विकसित करून कोरफड उद्योगाला आरंभ केला. आज हरीश यांचे मासिक उत्पन्न 1-2 कोटी रुपयांच्या दरम्यान आहे.

English Summary: the story of richest farmer in india
Published on: 21 October 2021, 10:34 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)