News

मराठवाड्यात काही ठिकाणी दुर्दैवाने भर पावसाळ्यात पाण्याचे टँकर सुरु आहेत. दुष्काळाची भयावय परिस्थित निर्माण झाली आहे. सरकारने यात लक्ष देण्याची गरज आहे.

Updated on 28 August, 2023 1:53 PM IST

छत्रपती संभाजीनगर

मराठवाड्यातच नव्हे तर सगळ्या भागात सध्या पावसाची कमतरता आहे. ऑगस्ट महिना संपत आला तरी चांगला पाऊस नाही. पेरणी झालेल्या पिकांची वाढ खुंटली आहे, त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी, अशी मागणी आमदार अंबादास दानवे यांनी केली आहे.

अंबादास दानवे म्हणाले की, मराठवाड्यात काही ठिकाणी दुर्दैवाने भर पावसाळ्यात पाण्याचे टँकर सुरु आहेत. दुष्काळाची भयावय परिस्थित निर्माण झाली आहे. सरकारने यात लक्ष देण्याची गरज आहे. ज्या पद्धतीने सरकार शासन आपल्या दारी कार्यक्रम राबवत आहे. तसा कार्यक्रम सरकारने शेतकऱ्यांच्या दारात सुरु कराव, त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात, असंही दानवे म्हणाले आहेत.

पुढे ते म्हणाले की, आई जेवू घाले ना आणि बाप भीक मागू देईना, अशी स्थिती राज्यातील शेतकऱ्यांची झाली आहे. शेतकऱ्यांना आतापर्यंत २५ टक्के इन्शुरन्स मिळायला पाहिजे होता. तसंच मागच्या अतिवृष्टीची देखील मदत शेतकऱ्यांना मिळाली नाही. या सगळ्या स्थितीमध्ये सरकारने शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहणे गरजेचे आहे. पण सरकारकडून तसं दिसत नाही. हे सरकार शेतकऱ्यांशी असंवेदनशील आहे, असं देखील दानवे म्हणाले आहेत.

दरम्यान, राज्यात सध्या कांदा, सोयाबीन, मोसंबी, आले पिकांच्या विविध समस्या आहेत. त्याबाबत सरकार काही बोलत नाही. सरकार फक्त शासन आपल्या दारी शो करत आहे. सरकारचे विमान, हेलिकॉप्टर्स वापरायचे. ऑफिसमध्ये सरकारी अधिकारी यांना बसू द्यायचं नाही, अशी टीका देखील दानवे यांनी केली आहे.

English Summary: The state of the farmers such that mothers do not eat and fathers do not beg'But the government
Published on: 28 August 2023, 01:53 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)