News

तोट्याच्या शेतीमुळे तरूण शेतीतून बाहेर पडू लागले आहेत. सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकरी सोयाबीन आणि कापूस दरात सातत्यानं चढ़-उतार होत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण होत आहे.

Updated on 11 October, 2023 2:58 PM IST

आनंद ढोणे

Parbhani News : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने ऊस कापूस व सोयाबीन परिषद परभणीतील ताडकळस येथे पार पडली. केंद्र सरकारच्या दुर्लक्षित धोरणामुळे शेती तोट्यात गेल्याने शेती करणे शेतकऱ्यांपुढे मोठे आवाहन निर्माण झाले असून याचे गंभीर परिणाम देशाला भोगावे लागणार आहेत, असा हल्लाबोल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सरकारवर केला आहे.

तोट्याच्या शेतीमुळे तरूण शेतीतून बाहेर पडू लागले आहेत. सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकरी सोयाबीन आणि कापूस दरात सातत्यानं चढ़-उतार होत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण होत आहे. आयात निर्यातीच्या चुकीच्या धोरणामुळे मंदीचा फटका शेतक-यांना बसू लागला आहे. उत्पादन खर्चात प्रचंड वाढ झाल्याने शेतक-यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे, असंही शेट्टी म्हणाले.

पुढे शेट्टी म्हणाले की, केंद्र शासनाचे आयात निर्यात धोरण शेतकऱ्यांच्या ऊस सोयाबीन व कापूस या पिकांचे भाव पडण्यास कारणीभूत असल्याचे सांगितले. केंद्र सरकारने अदानी, अंबानी सारख्या उद्योगपतींच्या हितासाठी पामतेल आणि कापसाच्या गाठी आयात करून ऐन पिकाच्या हंगामामध्ये सोयाबीन आणि कापसाचे भाव पाडले. जिएम सीड्सच्या लागवडीसाठी परवानगी देण्याची मागणी ही यावेळी केली.

ऊस परिषदेत आणखी काय ठरले.
१) यावर्षी ऊसाला प्रतिटन एकरकमी ३३०० रुपये पहिली उचल कारखान्यांनी जाहीर केल्याशिवाय कारखान्याचे धुराडे पेटू देणार नाही.
२) मागील हंगामातील ऊसाला तीनशे रुपये एफ.आर.पी.सोडून ज्यादा देण्यात यावे.
३) सोयाबीनला ९ हजार रुपये व कापसाला १२ हजार ३०० रुपये दर स्थिर ठेवण्यात यावा अन्यथा लोकप्रतिनिधींना मतदारसंघात फिरू देणार नाही.
४) चालू वर्षातील सोयाबीन वर पडलेल्या येलो मोझँक या आजाराचा पिक विम्याच्या नुकसान भरपाई ग्रस्त आजारामध्ये समावेश करून नैसर्गिक आपत्ती घोषित करावी.
५) २५ टक्के अग्रीम पिक विमा रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी.
६) मराठवाड्यामध्ये दुष्काळ जाहीर करून कर्जमुक्ती करण्यात यावी.

English Summary: Swabhimani sugarcane council passed in Parbhani Raju Shetti attack on the government
Published on: 11 October 2023, 02:58 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)