News

राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसासह गारपीट होत असून याचा फटका शेतीला बसत आहे. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त शेतीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याची माहिती कृषी विभागाला देण्यात आल्याची माहिती कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी दिली. ते सांगलीमध्ये बोलत होते.

Updated on 19 March, 2020 5:21 PM IST


राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसासह गारपीट होत असून याचा फटका शेतीला बसत आहे. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त शेतीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याची माहिती कृषी विभागाला देण्यात आल्याची माहिती कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी दिली. ते सांगलीमध्ये बोलत होते.

कोरोनाचा कृषी क्षेत्राला बसत असणाऱ्या फटक्याबाबतशी त्यांनी माहिती दिली. कोरोना व्हायरसमुळे जगातील अर्थव्यवस्था ढासळली आहे. भारतात व आपल्या राज्यातही याचा परिणाम जाणवत आहे. मात्र, तूर्त कोरोनाच्या परिस्थितीवर मात करणे हे ध्येय आहे. त्यानंतर नुकसानीच्या बाबतीत विचार होईल. त्यामुळे यावर आता भाष्य करणे योग्य होणार नाही. या संपूर्ण परिस्थिती निवळल्यानंतर याबाबतीत बोलणे योग्य होईल, असेही मंत्री कदम यांनी स्पष्ट केले.

गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील काही जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसासह गारपीट होत आहे. याचा मोठा फटका फळबागा आणि रब्बी पिकांना बसला आहे. पावसामुळे द्राक्ष, मोसंबी, संत्रा, केळी, लिंबू, डाळींब अशा फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. तर, गहू, हरभरा, मका या पिकांचीही खराबी झाली आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. परभणी, सांगली, लातूर, धुळे, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, जळगाव या जिल्ह्यात अवकाळी पावसासह जोरदार गारपीट झाली आहे.

English Summary: state agriculture minister order for survey compensation
Published on: 19 March 2020, 05:16 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)