News

यावर्षी ऊस लागवड क्षेत्र वाढल्याने असेच अवेळी झालेला पाऊस तसेच कारखान्यांची विस्कळीत ऊसतोडणी यंत्रणा इत्यादी कारणांमुळे जानेवारी चा तिसरा आठवडा सुरू झाला तरीसुद्धा सातारा जिल्ह्यातील बहुतांशी कारखान्यांच्या ऊस तोडणी चा कार्यक्रम अजूनही मागील वर्षाच्या जूनच्या पहिल्या सप्ताहातील म्हणजे जवळजवळ वीस महिन्यानंतर सुरू असल्यामुळे ऊस तोड होण्यास विलंब होत आहे.

Updated on 20 January, 2022 3:59 PM IST

यावर्षी ऊस लागवड क्षेत्र वाढल्याने असेच अवेळी झालेला पाऊस तसेच कारखान्यांची विस्कळीत ऊसतोडणी यंत्रणा इत्यादी कारणांमुळे जानेवारी चा तिसरा आठवडा सुरू झाला तरीसुद्धा सातारा जिल्ह्यातील बहुतांशी कारखान्यांच्या ऊस तोडणी चा कार्यक्रम अजूनही मागील वर्षाच्या जूनच्या पहिल्या सप्ताहातील म्हणजे जवळजवळ वीस महिन्यानंतर सुरू असल्यामुळे ऊस तोड होण्यास विलंब होत आहे.

या वर्षी सातारा जिल्ह्याचा विचार केला तर कारखान्यांचा गाळप हंगाम हा वेळेत सुरू झाला होता परंतु बऱ्याच कारखान्यांनी  पुर्ण एफ आर पी,तर काही कारखान्यांनी 80 20 चा फॉर्म ला स्वीकारत ऊस बिले काढले आहेत. यावर्षी  सातारा जिल्ह्यातील खंडाळा, फलटण मान तसेच खटाव या दुष्काळी तालुक्यांमध्ये उसाच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे या हंगामात गाळपासाठी मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र शिल्लक आहे. उत्पन्नात वाढ व लवकर तुटावा यासाठी आडसाली ऊस घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.

जेव्हा ऊसतोडणी हंगाम सुरू झाला त्यावेळी जोरदार पाऊस झाल्याने ऊस तोडणी यंत्रणा ठप्प झाली होती. त्यामुळे पावसामुळे वाया गेलेले दिवस तसेच आणि कारखान्यांची विस्कळीत झालेली तोडून यंत्रणेचा परिणाम दिसू लागला असून संथगतीने सुरू आहे. सध्या जिल्ह्यात 16 पैकी 13 कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू आहे.

त्यातील बहुतांशी कारखान्यांच्या ऊस तोडणी कार्यक्रम जूनच्या दुसऱ्या सप्ताहातील सुरू असल्यामुळे तसेच पाऊस व विस्कळीत यंत्रणेमुळे ऊस तोडणी विलंब होत असल्याने उसाला तुरा येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे उसाच्या उत्पादनात,वजनात घट होण्याची भीती वाढल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

English Summary: so late of cutting to cane crop in satara district so many farmer worried about that problem
Published on: 20 January 2022, 03:59 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)