News

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी वैज्ञानिक आणि संशोधकांनी शेतकऱ्यांशी नियमित संवाद ठेवावा आणि मिशन मोड वर काम करावे असे आवाहन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केले आहे. गुंतवणूक खर्च कमी, मूल्यवर्धन आणि कृषीमालाचे योग्य विपणन या द्वारे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट साध्य होऊ शकते असेही ते म्हणाले.

Updated on 31 August, 2018 9:19 PM IST

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी वैज्ञानिक आणि संशोधकांनी शेतकऱ्यांशी नियमित संवाद ठेवावा आणि मिशन मोड वर काम करावे असे आवाहन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केले आहे. गुंतवणूक खर्च कमी, मूल्यवर्धन आणि कृषीमालाचे योग्य विपणन या द्वारे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट साध्य होऊ शकते असेही ते म्हणाले. कर्नाटकमधल्या बिदर येथे कर्नाटक पशूवैद्यक, पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या 10 व्या दीक्षांत समारंभात ते आज बोलत होते.

नील क्रांतीवर भर देण्याची गरज उपराष्ट्रपतींनी व्यक्त केली. मत्स्य व्यवसायाला प्रोत्साहन देऊन कृषी आणि दुग्धविकास क्षेत्राबरोबरच मत्स्य व्यवसायालाही प्राधान्य द्यायला हवे असे ते म्हणाले.

पशूपालन, दुग्ध आणि कुक्कुटपालन यासारखे पूरक व्यवसाय, शेतकऱ्याच्या उत्पन्नात भर घालण्यात महत्वाची भूमिका बजावतात. 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याबरोबरच अन्न आणि पोषण सुरक्षा पुरवण्याचे जागतिक आव्हान पेलणेही महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

English Summary: scientists and researchers work on mission mode for doubling farmers income up to year 2022
Published on: 31 August 2018, 09:18 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)