News

ऊसदरासंदर्भात स्वाभिमानीच्या वतीने राज्यभरात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनास शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यासंबंधी 21 नोव्हेंबरपर्यंत तोडगा न निघाल्यास महामार्ग रोखण्याची घोषणा राजू शेट्टी यांनी केली आहे. मागील हंगामातील उसाचा दुसरा हप्ता ४०० रुपये द्यावा आणि यंदाच्या गाळप होणाऱ्या उसाला पहिली उचल ३५०० रूपये द्यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने चक्का जाम आंदोलन सुरू करण्यात आलं आहे.

Updated on 20 November, 2023 11:56 AM IST

ऊसदरासंदर्भात स्वाभिमानीच्या वतीने राज्यभरात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनास शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यासंबंधी 21 नोव्हेंबरपर्यंत तोडगा न निघाल्यास महामार्ग रोखण्याची घोषणा राजू शेट्टी यांनी केली आहे. मागील हंगामातील उसाचा दुसरा हप्ता ४०० रुपये द्यावा आणि यंदाच्या गाळप होणाऱ्या उसाला पहिली उचल ३५०० रूपये द्यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने चक्का जाम आंदोलन सुरू करण्यात आलं आहे.

१३ सप्टेंबर पासून ऊस दरासाठी आंदोलन सुरू करण्यात आले आहे. त्यानंतर १७ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर पर्यंत आक्रोश पदयात्रा काढण्यात आली होती. ७ नोव्हेंबर रोजी जयसिंगपूर येथे २२ वी ऊस परिषद झाली. तसेच ७ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर पर्यंत जयसिंगपूर येथील विक्रमसिंह क्रीडागंणावर ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे. मात्र अजूनही ऊस प्रश्नावर तोडगा निघालेला नाही त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे.

ऊस दरासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात तीन वेळा बैठका घेण्यात आल्या होत्या. तरीही शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झालेल्या नसल्याने काल सांगली व कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील संपूर्ण ऊस पट्ट्यामध्ये चक्का जाम आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. त्याचबरोबर राज्य सरकारला ऊस दरावर चर्चा करण्यास वेळ नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांमध्ये त्यांना कोणताही रस दिसत नाही, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे. दरम्यान यासंबंधी 21 नोव्हेंबरपर्यंत तोडगा न निघाल्यास महामार्ग रोखण्याची घोषणा राजू शेट्टी यांनी केली आहे.

English Summary: Raju Shetty's announcement that the national highway will be blocked if the sugarcane issue is not resolved
Published on: 20 November 2023, 11:56 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)