News

आज कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांन विरोधात राजू शेट्टी यांनी आत्मक्लेष पदयात्रा सुरू केली आहे. त्याची सुरुवात शिरोळ तालुक्यामधील दत्त कारखान्यापासून झाली आहे. हे आत्मक्लेश आंदोलन एकूण 22 दिवस करण्यात येणार आहे. त्याचबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 22 वी ऊस परिषदही पार पडणार आहे.

Updated on 17 October, 2023 11:56 AM IST

Kolhapur News : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांन विरोधात राजू शेट्टी यांनी आत्मक्लेष पदयात्रा सुरू केली आहे. या यात्रेला आज (दि.१७) पासून सांगलीतीलशिरोळ तालुक्यामधील दत्त कारखान्यापासून सुरुवात करण्यात आली आहे. आत्मक्लेश आंदोलन एकूण २२ करण्यात येणार असून या दरम्यान राजू शेट्टी ५२२ किलोमीटरचा प्रवास करणार आहेत. यावेळी ते शतकऱ्यांच्या समस्या आणि त्यांचे प्रश्न जाणूुन घेणार आहेत. यासोबतच स्वाभिमानी शेतकरी संघटनेची २२ वी ऊस परिषदही देखील पार पडणार आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून २२ दिवस ५२२ किलोमीटर पदयात्रा असणार आहे. जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी गतवर्षीच्या हंगामातील ४०० रुपयांचा हप्ता दिल्याशिवाय कारखाना सुरु केला दिला जाणार नाही, असा इशारा यावेळी शेट्टी यांनी दिला आहे. 

प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांची सांगली येथे भेट घेतली आहे. यावेळी कडू यांनी या पदयात्रेला पाठिंबा दिला आहे.

English Summary: Raju Shettys Aatmaklesh Padayatra starts from today
Published on: 17 October 2023, 11:27 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)