News

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारने जाहीर केलेली मदत अतिशय तंटपुंजी आहे. त्यामुळे त्यात बदल करुन एकरी १ लाख रुपये मदत शेतकऱ्यांना द्यावी.

Updated on 01 September, 2023 4:00 PM IST

बुलढाणा

बुलढाणा जिल्ह्यात आलेल्या पूरस्थितीचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पाहणी दौरा केला आहे. यावेळी नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत मिळावी यासाठी राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांसह तहसिल कार्यालयावर मोर्चा काढला.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारने जाहीर केलेली मदत अतिशय तंटपुंजी आहे. त्यामुळे त्यात बदल करुन एकरी १ लाख रुपये मदत शेतकऱ्यांना द्यावी. पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या आहेत. पिकांचे नुकसान झाले आहे. बोरवेलमध्ये गाळ गेला आहे. विटभट्टी व्यावसाईकांचे प्रचंड नुकसान झाले आहे, त्या सर्वांना मदत मिळावी अशाी मागणी शेट्टी यांनी केली आहे.

पुढे ते म्हणाले की, बुलढाण्यात पूरस्थिती निर्माण होऊन ८ दिवस झाले तरी येथिल नागरिकांना मदत मिळाली याचा जबाब स्थानिक लोक प्रतिनिधींनी सरकारला विचारला पाहिजे. पण नुकसान झाल्यानंतर स्थानिक प्रतिनिधींकडून याबाबत काहीही बोललं जात नाही, असं म्हणत राजू शेट्टींनी स्थानिक आमदारांवर निशाना साधला आहे.

"या नैसर्गिक आपत्तीमध्ये अनेक नागरिकांची घरे वाहून गेली आहेत. अशा नागरिकांचे स्थलांतर करून घरकूल योजनेतून या नुकसानग्रस्तांना घरे बांधून द्यावीत. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या आहेत त्या शेतकऱ्यांनाही चांगली मदत जाहीर करावी" अशी मागणीही शेट्टी यांनी केली आहे.

English Summary: Raju Shetty Help loss-affected farmers with Rs 1 lakh
Published on: 29 July 2023, 06:19 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)