News

राज्यात पावसाचा कहर सुरूच आहे. नवरात्रीनंतरही पावसाचे जोरदार बरसने सुरूच आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. या पावसामध्ये भाजीपाला पिकासह सोयाबीन, कापूस, मका या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी नुकसान भरपाईची मागणी करत आहेत.

Updated on 11 October, 2022 1:46 PM IST

राज्यात पावसाचा (Rain) कहर सुरूच आहे. नवरात्रीनंतरही पावसाचे जोरदार बरसने सुरूच आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध ठिकाणी मुसळधार पाऊस (Heavy Rain) झाला आहे. या पावसामध्ये भाजीपाला पिकासह सोयाबीन, कापूस, मका, मिरची (Chili) या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी नुकसान भरपाईची (Damages compensation) मागणी करत आहेत.

नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. याशिवाय व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या लाल मिरच्याही खराब होत आहेत. वाळवण्यासाठी ठेवलेल्या मिरच्यांवर पावसाचे पाणी लागल्याने काळ्या पडू लागल्या आहेत.

त्यामुळे व्यापाऱ्यांचे लाखोंचे नुकसान होत आहे. मिरची विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांचेही नुकसान झाले असून पावसाच्या पाण्यामुळे शेतमाल ओला झाला आहे. शेतकऱ्यांबरोबरच व्यापारीही चिंतेत आहेत. पावसामुळे सोयाबीन (Soyabean), कापूस, मका, मूग, लाल मिरचीसह फुलशेतीचेही अधिक नुकसान झाले आहे. प्रशासनाने पंचनामा करून तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे.

महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये वाहनधारकांना फटका! पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ, पहा नवे दर...

हजारो क्विंटल मिरची वाया गेली

नंदुरबार जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. लाल मिरचीचे लाखोंचे नुकसान झाले आहे. राज्यात सध्या सोयाबीन आणि कापूस वेचणीचे काम सुरू आहे. अशा परिस्थितीत पावसाने दडी मारल्याने तयार झालेले पीक नासाडी होत आहे.

जिल्ह्यात मिरची खरेदी सुरू झाली आहे. अशा स्थितीत नंदुरबार बाजार समितीमध्ये ओल्या मिरच्या विकत घेऊन सुकविण्यासाठी फुटपाथवर ठेवल्या जातात. मात्र यंदा व्यापाऱ्यांनी खरेदी केलेली हजारो क्विंटल मिरची पावसाच्या पाण्यात भिजून खराब झाली.

पावसामुळे नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांना भरपाई देण्याची मागणी व्यापारी संघटनेने केली आहे.त्यासोबतच खरेदी केलेल्या मिरचीला विमा संरक्षण देण्याची मागणी केली जात आहे. मात्र शासन याकडे लक्ष देत नसल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

महाराष्ट्रासह आज 23 राज्यांमध्ये कोसळणार मुसळधार पाऊस; यलो अलर्ट जारी

शेतकऱ्यांनी केली नुकसान भरपाईची मागणी

जिल्ह्यात पावसामुळे मिरचीसह कापूस, ज्वारी, सोयाबीन या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 14 ऑक्टोबरपर्यंत पाऊस सुरू राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंताही वाढली आहे.

शासनाकडून लवकरात लवकर पंचनामे (Panchnama) करून अधिक नुकसान भरपाईची मागणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केली आहे. परतीच्या पावसाने खरीप हंगामातील (Kharip Season) उत्पादनाची नासाडी झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

महत्वाच्या बातम्या:
राज्यात सोयाबीनला कवडीमोल भाव? निसर्गाचा लहरीपणा आणि कमी भावामुळे शेतकरी हवालदिल
मुलायम सिंह यादव यांची संपत्ती किती कोटींची होती? मुलगा अखिलेशकडूनही घेतले होते कर्ज

English Summary: Rain in the state! Thousands of quintals of red chilli damaged due to rain; Millions of losses
Published on: 11 October 2022, 01:46 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)