News

निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकांच्या उत्पादनात घट झाली आहे मात्र बाजारात दर स्थित असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे. परंतु केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या नेहमी अडचणी राहिलेल्या आहेत. अवकाळी पाऊस तसेच ढगाळ वातावरण असल्याने केळीच्या बागेवर किडींचा प्रादुर्भाव तर झालाच आहे पण त्यासोबतच थंडीमध्ये वाढ झाल्याने मागील १५ दिवसात बाजारामध्ये केळीला चार ते पाच हजार प्रति क्विंटल असा दर मिळाला. पण आता मात्र चित्र बदलले आहे जे की थंडी कमी होऊन उन्हाळा सुरू झालेला आहे आणि त्यात महाशिवरात्री जवळ आली असल्याने व्यापाऱ्यांची केळी ला जास्त मागणी आहे. राज्यातील विविध बाजारपेठेत केळीचे प्रति टन दर १५ ते १६ हजार रुपयांवर पोहचले आहेत.

Updated on 21 February, 2022 8:07 PM IST

निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकांच्या उत्पादनात घट झाली आहे मात्र बाजारात दर स्थित असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे. परंतु केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या नेहमी अडचणी राहिलेल्या आहेत. अवकाळी पाऊस तसेच ढगाळ वातावरण असल्याने केळीच्या बागेवर किडींचा प्रादुर्भाव तर झालाच आहे पण त्यासोबतच थंडीमध्ये वाढ झाल्याने मागील १५ दिवसात बाजारामध्ये केळीला चार ते पाच हजार प्रति क्विंटल असा दर मिळाला. पण आता मात्र चित्र बदलले आहे जे की थंडी कमी होऊन उन्हाळा सुरू झालेला आहे आणि त्यात महाशिवरात्री जवळ आली असल्याने व्यापाऱ्यांची केळी ला जास्त मागणी आहे. राज्यातील विविध बाजारपेठेत केळीचे प्रति टन दर १५ ते १६ हजार रुपयांवर पोहचले आहेत.


व्यापाऱ्यांकडून साठवणूकीला प्राधान्य :-

आता कुठे केळी ला पोषक वातावरण तयार झाले आहे त्यामुळे केळीमध्ये वाढ होत आहे नाहीतर सारखी कोणती न कोणती संकटे केळी उत्पादकांवर येतच असायची. मागील आठ दिवसांपासून केळी चे चित्रच बदलले आहे. तसेच महाशिवरात्री सुद्धा जवळ आली असल्याने केळीला व्यापाऱ्यांकडून मोठी मागणी आहे शिवाय निसर्गाच्या लहरीपणामुळे केळीच्या उत्पादनात घट निर्माण झाली असल्यामुळे केळी च्या दरात भलतीच वाढ झाली आहे. आतापर्यंत व्यापारी केळी खरेदी करण्यास पाठ दाखवत होते पण आता महाशिवरात्री जवळ आल्याने व्यापारी वर्ग केळी चा साठा करत आहेत.

बागेवर कोयता चालवून शेतकऱ्यांना होतोय पश्चाताप :-

मागील काही दिवसांपूर्वी केळीचे दर पूर्णपणे घसरले होते तसेच वाढत्या थंडीचा प्रादुर्भाव असल्याने नागरिक सुद्धा केळीकडे पाठ फिरवत होते. ओमीक्रोन चा प्रादुर्भाव वाढला असल्यामुळे वाढीव दर सोडाच शेतकऱ्यांना तोडणी सुद्धा परवडत नसल्यामुळे स्वतः केळी उत्पादकांनी केळी च्या बागेवर कोयता चालवला होता आणि त्यानंतर लगेच १५ दिवसांनी केळी ला चांगला दर मिळू लागला. ज्या ज्या शेतकऱ्यांनी रागाच्या भरात बागेवर कोयता चालवला त्या शेतकऱ्यांना पश्चाताप होत आहे.

आता मोजक्याच शेतकऱ्यांना मिळणार लाभ :-

निसर्गाच्या लहरीपणामुळे केळीवर किडीचा प्रादुर्भाव झाला तसेच दर घसरले असल्याने शेतकऱ्यांनी थेट बागा न बागा उध्वस्त केल्या. मात्र आता मागील दीड वर्षात कधी एवढा दर मिळाला नाही तेवढा आता केळी ला दर मिळत आहे त्या प्रतिकूल परिस्थितीत ज्या शेतकऱ्यांनी केळीच्या बागेची काळजी घेतली त्यांना आता वाढीव दराचा फायदा भेटत आहे. महाशिवरात्री जवळ आली असल्याने अजून वाढीव दर केळी ला भेटणार आहेत.

English Summary: Prices of bananas have doubled in 15 days, 15 to 16 thousand per tonne in the market
Published on: 21 February 2022, 08:06 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)