News

जळगाव जिल्ह्यातील जवळजवळ साडेसहा हजार शेतकऱ्यांचा वीज पुरवठा महावितरणने खंडित केला आहे. मागील काही दिवसांपासून थकबाकीदार शेतकऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान संबंधित कारवाई टाळण्यासाठी शासनाने कृषी पंप धारक थकबाकी असल्यास शेतकऱ्यांना 50 टक्के सवलत वीज बिलात दिली आहे. या सवलतीचा लाभ घेऊन कारवाई टाळण्याचे आवाहन महावितरण प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Updated on 12 April, 2021 2:00 PM IST

जळगाव जिल्ह्यातील जवळजवळ साडेसहा हजार शेतकऱ्यांचा वीज पुरवठा महावितरणने खंडित केला आहे.  मागील काही दिवसांपासून थकबाकीदार शेतकऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे.

कोरोनामुळे महावितरण तर्फे सर्व प्रकारच्या ग्राहकांचे प्रत्यक्षात रीडिंग न घेता त्यांना सरासरी प्रमाणे बिल देण्यात आले. मात्र देण्यात आलेली वीजबिल अवाजवी असल्याच्या तक्रारी करत ग्राहकांनी वीज बिल भरण्याकडे पाठ फिरवली. संबंधित येणाऱ्या तक्रारी निवारणासाठी महावितरणने जिल्ह्याभरात तक्रार निवारण शिबिरे घेतली.यामध्ये ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करून विज बिल भरण्याचे आवाहन करण्यात आले.

 

तरीदेखील ग्राहकांकडून विज बिल भरण्यासाठी प्रतिसाद न आल्याने साडेतेरा शेकोटीच्या घरात थकबाकी जमा झाली आहे. महावितरण तर्फे मागच्या वर्षीच्या मार्च पासून वीजबिल न भरलेल्या सर्व प्रकारच्या ग्राहकांवर कारवाईचा बडगा उगा रण्यात आला आहे.

 

त्यामध्ये कृषी पंप धारक शेतकरी बांधवांचा समावेश आहे. त्यानुसार गेल्या पंधरा दिवसात जळगाव जिल्ह्यातील सहा हजार 491 शेतकरी बांधवांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे.

English Summary: Power supply to six and a half thousand arrears farmers in Jalgaon district
Published on: 03 April 2021, 09:50 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)