News

पुणे : केंद्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या अत्यंत महत्वकांक्षी १ लाख कोटी रुपयांच्या कृषी पायाभूत सुविधा निधीअंतर्गत महाराष्ट्र राज्याला अंदाजे ८,४६० कोटी रुपये मिळणार आहेत. या योजनेच्या नुकत्याच जाहीर झालेल्या मार्गदर्शक प्रणालीअंतर्गत ही माहिती उपलब्ध झाली आहे. यामुळे राज्यतील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

Updated on 27 July, 2020 3:30 PM IST

पुणे : केंद्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या अत्यंत महत्वकांक्षी १ लाख कोटी रुपयांच्या कृषी पायाभूत सुविधा निधीअंतर्गत महाराष्ट्र राज्याला अंदाजे ८,४६० कोटी रुपये मिळणार आहेत. या योजनेच्या नुकत्याच जाहीर झालेल्या मार्गदर्शक प्रणालीअंतर्गत ही माहिती उपलब्ध झाली आहे. यामुळे राज्यतील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
जुलैच्या पहिल्या आठवड्यात सरकारने या निधीला मान्यता दिली आहे. ही योजना ४ वर्षांसाठी असेल. या योजनेच्या माध्यमातून पहिल्या वर्षी १० हजार कोटी उपलब्ध होणार आहे. नंतरच्या तीन वर्षाच्या काळात प्रयेक वर्षी ३० हजार कोटी उपलब्ध होणार आहे. या योजनेअंतर्गत सर्वात जास्त १२८३१ कोटी उत्तर प्रदेशला मिळाले आहेत. त्या खालोखाल राजस्थान ( ९०१५ कोटी), गुजरात ( ७२५२ कोटी) हि राज्ये आहेत. या योजनेअंतर्गत काढणीअंतर्गत येणारे कमी, काढणीपश्चात कामे यांना या गोष्टींसाठी कर्जे मिळणार आहेत.

या निधीअंतर्गत गावपातळीवरील पत सोसायट्या, पणन सोसायट्या, कृषी उत्पादक कंपन्या, बचत गट, शेतकरी, बुउद्देशीय संस्था, स्टार्ट अप, कृषी उदयोजक, केंद्र आणि राज्य सरकाने पुरस्कृत केलेले खाजगी प्रकल्पांना मदत होणार आहे.

English Summary: Maharashtra will get Rs 8,000 crore for agricultural infrastructure
Published on: 27 July 2020, 03:30 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)