News

यावर्षी अतिवृष्टीमुळे खरीप हंगामाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन हातात आलेला शेतमाल मातीमोल झाला. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेल्या शेताचे पाहणी आणि पंचनामे पूर्ण करण्यात येतील असे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत सांगितले

Updated on 24 December, 2021 6:58 PM IST

 यावर्षी अतिवृष्टीमुळे खरीप हंगामाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन हातात आलेला शेतमाल मातीमोल झाला. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेल्या शेताचे पाहणी आणि पंचनामे पूर्ण करण्यात येतील असे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत सांगितले

त्यामुळे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांचे पंचनामे अपूर्ण असतील अशा शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

 अमरावती जिल्ह्यामधील अंजनगाव तालुक्यातील सुरजी, सेनगाव येथील शेतकऱ्यांना तलाठी यांनी यादीतून वगळले याबाबतचा प्रश्न विधानसभा सदस्य बळवंत वानखेडे, प्रकाश सोळंके यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता

या प्रश्नाला उत्तर देताना थोरात म्हणाले की, जून आणि जुलै 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीने शेती मोठ्या प्रमाणात खरडून गेली असताना यादी प्रत्यक्ष नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तलाठी यांनी वगळले ही बाब खरी नाही. याशिवाय ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांच्या संयुक्त पथकाने अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांची सर्वेक्षण पंचनामा यादी ग्रामपंचायत फलकावर  प्रसिद्ध केली होती. 

तसेच संबंधित यादीबाबत काही आक्षेप असल्यास 8 ऑगस्ट 2021 पर्यंत आक्षेप दाखल करण्याचे कळवले होते. तसेच 5 ऑगस्ट 2021 रोजी प्राप्त अक्षय पान बाबत संयुक्त पथकाने शेतीचे पाणी आणि पंचनामा करून प्राप्त आक्षेप विहित कालावधीत निकाली काढले आहेत.

English Summary: maharashtra goverment do panchnaama again give information in assembly
Published on: 24 December 2021, 06:58 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)