News

कोरोनामुळे अनेक देशातील उद्योगधंद्यावर परिणाम झाला. यामुळे आर्थिक व्यवहार ठप्प झाले होते. दरम्यान आता हळूहळू सर्व परिस्थिती रुळावर येत आहे. पण कोरोनाचा परिमाण पाहता भारत सरकारकडून उद्योगांना चालना देण्यासाठी कर्जांची सुविधा दिली आहे.

Updated on 06 November, 2020 3:25 PM IST


कोरोनामुळे अनेक देशातील उद्योगधंद्यावर परिणाम झाला. यामुळे आर्थिक व्यवहार ठप्प झाले होते. दरम्यान आता हळूहळू सर्व परिस्थिती रुळावर येत आहे. पण कोरोनाचा परिमाण पाहता भारत सरकारकडून उद्योगांना चालना देण्यासाठी कर्जांची सुविधा दिली आहे. पण शेती व्यवसायात मात्र याचा काही उपयोग होताना दिसत नाही. कोरोनाचा परिणाम पीक कर्ज वाटपावर झालेला दिसत असून बँका आपले ध्येय्य पुर्ण करण्यास असक्षन दिसत आहेत.

यंदा पीक कर्ज घेण्याला रत्नागिरी जिल्ह्यात शेतकऱ्यांचा अत्यंत कमी प्रतिसाद मिळाला आहे. करोनामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. हे अगदी साहजिकच आहे कोरोनामूळे सर्व क्षत्रात कमालीची घसरण अनुभवास येत आहे. चालू आर्थिक वर्षांत जिल्ह्यासाठी ५६३ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप करण्याचे लक्ष्य देण्यात आले होते; मात्र प्रत्यक्षात आत्तापर्यंत ३२० कोटी १६ लाख रुपयेच कर्ज वितरीत झाले असून उद्दिष्टाच्या तुलनेत ५६ टक्केच लक्ष्य गाठण्यात बॅंकांना यश आले आहे. कोकणातील शेतकऱ्याचा मुळातच कर्ज काढून शेती  करण्याकडे अत्यंत कमी कल आहे. खरीप हंगामातील भातशेतीसाठी फारसे कर्ज उचलले जात नाही.तसेच काजू पीकाला कोकणात मोठा भर देण्यात येतो.


निसर्ग चक्री वादळामुळे कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग किनार्यावरील जिल्ह्यांच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. आंबा—काजू बागायतींसाठी घेण्यात येणारी कर्जे वगळता व्यावसायिक तत्त्वावर रब्बीची शेती करणारे कमीच आहेत. जिल्ह्यात शेती करणाऱ्या सभासदांची संख्या सव्वालाख असून ८५ हजार हेक्टरवर शेती होते. त्यात भात लागवडीच क्षेत्र सुमारे ७० हजार हेक्टर आहे. गावागावात मोठ्या प्रमाणात चाकरमानी मुंबईहून दाखल झाल्यामुळे यंदा फळबाग लागवडीसह भातशेतीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता होती; परंतु कोरोनातील टाळेबंदीमुळे शेतकरी कर्जप्रकरण करण्यासाठी बाहेर पडणेच शक्य होत नव्हते.


त्याचबरोबर घेतलेले कर्ज फेडताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन अनेक शेतकऱ्यांनी त्याकडे पाठ फिरवली असावी, असा अंदाज आहे. अजून बऱ्याच ठिकाणी वाहतूक सुरळीत सुरू नाही आणि हवामानातील बदल तसेच त्यामुळे होणारे नुकसान यामुळे लोकांनी पीक कर्जाकडे पाठ फिरवली आहे, असे वर्तवण्यात येते. जिल्हा निबंधक डॉ. अशोक गार्डी म्हणाले की, शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी आवश्यक कर्ज बँकांनी उपलब्ध करुन द्यावे, अशी सूचना दिली होती. पण यंदा करोनामुळे कर्ज घेणाऱ्यांचे प्रमाण कमी झालेले आहे.

English Summary: Low response of farmers for crop loan in Ratnagiri district
Published on: 06 November 2020, 03:25 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)