News

Maharashtra: देशात सध्या मान्सूनचा प्रवास सुरु आहे. महाराष्ट्रात देखील जोरदार मान्सून कोसळत आहे. मात्र काही भागात अति मुसळधार पावसाने शेतपिके जमीनदोस्त झाली आहेत. शेतकऱ्यांचा खरीप हंगाम वाया गेला आहे. नुकसानीचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची आस लागली आहे. राज्यातील शिंदे आणि फडणवीस सरकार शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी काय पाउले उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Updated on 09 August, 2022 1:57 PM IST

Maharashtra: देशात सध्या मान्सूनचा (Monsoon) प्रवास सुरु आहे. महाराष्ट्रात देखील जोरदार मान्सून कोसळत आहे. मात्र काही भागात अति मुसळधार पावसाने (Heavy Rain) शेतपिके जमीनदोस्त झाली आहेत. शेतकऱ्यांचा खरीप हंगाम (Kharif season) वाया गेला आहे. नुकसानीचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची आस लागली आहे. राज्यातील शिंदे आणि फडणवीस सरकार शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी काय पाउले उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्यात गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या मान्सूनच्या पावसाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांची तारांबळ उडाली आहे. त्याचवेळी नागपुरात झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जुलैच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत नागपुरात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी आवश्यक पंचनामे पूर्ण न झाल्याने मदत रक्कम मिळण्यात अडचणी निर्माण होत होत्या.

मात्र आता जिल्ह्यात नुकसानीचा पंचनामा (Panchnama) करण्याचे काम सुरू झाले आहे. दोन दिवसांत अहवाल सरकारला दिला जाईल. शेतकऱ्यांना लवकरच मदत मिळण्याची अपेक्षा जिल्ह्याचे प्रभारी विभागीय आयुक्त राधाकृष्ण बी यांनी व्यक्त केली आहे.मराठवाडा आणि विदर्भात दरवर्षी मुसळधार पावसाची प्रतीक्षा असते.

मात्र यंदा पाऊस उशिरा आणि नंतर अतिवृष्टीमुळे खरीप पिकांना अधिक फटका बसला आहे. दरवर्षी शेतकरी चांगल्या पावसाची वाट पाहत असतो. मात्र यंदा जुलैच्या पहिल्या दिवसापासून मुसळधार पावसाची प्रक्रिया सुरूच आहे.

धक्कादायक! भारतात 69% नोकऱ्या धोक्यात, अहवाल वाचून बसेल धक्का...

पावसामुळे पिकांचे कुठे नुकसान झाले

खरीप हंगामाच्या पेरण्या संपल्यानंतर पिकांमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे पिकांच्या वाढीवर परिणाम झाला आहे. आता उत्पादनाच्या अपेक्षाही संपल्या आहेत. विदर्भात १ लाख ३५ हजार हेक्टरवर लागवड केलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. सर्वाधिक नुकसान नागपुरात झाले आहे.

नागपूर विभागातील गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, नागपूर आणि भंडारा जिल्ह्यातही अतिवृष्टीमुळे भात, कापूस, तूर, सोयाबीनसह भाजीपाला आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले

शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी महत्त्वाची ठरणारी पंचनामा प्रक्रिया आता जिल्ह्यात अंतिम टप्प्यात आली आहे. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कृषी व महसूल विभागाचे अधिकारी शेतकऱ्यांच्या शेताचे व गावांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करत आहेत. तसेच साचलेल्या पाण्यामुळे दुर्गम भागात प्रवास करणे कठीण झाले होते. त्यामुळे आता पंचनामा सुरू झाला आहे. आता ९९ टक्के सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. नुकसानीचा अहवाल दोन दिवसांत सादर केला जाईल.

वांग्याच्या शेतीतून होईल बंपर कमाई! फक्त या तीन जातींची करा निवड व्हाल मालामाल

शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची गरज आहे

संततधार पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र पुन्हा पेरणी करूनही पीक पाण्यात बुडाले आहे. त्यामुळे यंदा पीक वाया गेल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच नव्हे तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवारही नुकसानीचा आढावा घेण्यासाठी विदर्भात पोहोचले होते.

त्यामुळे याचा मोठा फायदा होईल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. याच विरोधी पक्षनेत्यांनी खरीप पिकांच्या नुकसानीपोटी हेक्टरी ७५ हजार रुपये आणि फळबागांच्या झालेल्या नुकसानीपोटी हेक्टरी १ लाख ५० हजार रुपये भरपाई देण्याची मागणी केली आहे.

महत्वाच्या बातम्या:
केळी उत्पादकांचे अच्छे दिन! केळीला विक्रमी भाव...
शेतकऱ्यांनो पीक रोटेशननुसार करा शेती, एका पिकानंतर पुढचे पीक कोणते घ्यायचे, जाणून घ्या..

English Summary: Kharif crop damage survey complete
Published on: 09 August 2022, 01:57 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)