News

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्येता असल्यामुळे या चार-पाच दिवसात राज्यात अनेक भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतीमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Updated on 05 September, 2021 9:10 PM IST

 बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्‍यता असल्यामुळे या चार-पाच दिवसात राज्यात अनेक भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतीमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

कोकणातील रायगड,रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग तसेच मराठवाड्यातील लातूर,परभणी आणि नांदेड तसेच हिंगोली या जिल्ह्यांना मंगळवारी ऑरेंज अलर्ट दिला गेला आहे

 तसेच कोल्हापूर, सातारा, पुणे, ठाणे,पालघर,मुंबई,उस्मानाबाद,औरंगाबाद, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला गेला आहे.

 येत्या 48 तासात उत्तर आणि उत्तर मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्‍यता असल्यामुळे पुढील काही दिवसात राज्यातील बहुतांश भागात जोरदार तेअतीजोरदार पावसाची शक्यता असल्याचे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे.तसेच मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाची  शक्यता आहे.

येत्या सहा तारखेला पालघर, रायगड रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर,सातारा, पुणे, नाशिक, औरंगाबाद या जिल्ह्यांना औरंग्याला देण्यात आला आहे. तर येणाऱ्या आठ तारखेला पालघर, रायगड, सातारा आणि पुणे जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान कोकण किनारपट्टीलगत मच्छीमारांना सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

English Summary: in coming 4 to 5 days heavy rain guess of meterological department
Published on: 05 September 2021, 09:10 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)