Nagar News : अहमदनगर-आष्टी रेल्वेला भीषण आग लागल्याची घटना नगर तालुक्यातील शिराडोह परिसरात घडली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. या आग आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहे. आगीचे नेमके कारण अद्यापही समजू शकले नाही. या आगीत रेल्वेचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
रेल्वे शिराडोह परिसरामध्ये असताना ही आग लागल्याचे वृत्त समोर येत आहे. आग विझवण्याचं काम पोलीस आणि अग्निशामन दालकडून सुरु आहे. आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
रेल्वेला आग लागताच सर्व प्रवाशांना सुखरूप गाडीबाहेर काढण्यात आलं. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मात्र ही आग इतकी भीषण होती की त्यामध्ये रेल्वेचे मोठं नुकसान झालं आहे. सध्यातरी ही आग नियंत्रणात आणण्यासाठी यद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत.
सायंकाळी साडे तीन ते चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती मिळत आहे. रेल्वेमधील प्रवासी हे बाहेर पडल्याने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तसेच या गाडीला प्रवाशांचा हवा तेवढा प्रतिसाद नसल्याने गोंधळही झाला नाही.
Published on: 16 October 2023, 05:18 IST