News

कोकण पट्ट्यात सोमवारी संध्याकाळच्या वेळीअचानक पावसाने हजेरी लावली.आलेल्या पावसानेशेतकरांच्या तोंडाशी आलेला घास हिरावून जाण्याची भीती येथील फळ बागायतदारामध्ये निर्माण झाली आहे. सोमवारी संध्याकाळी सहा वाजता अचानक पाऊस सुरू झाल्याने मोहरात असलेला आंबा पुन्हा खराब होण्याची शक्यता आहे.

Updated on 19 January, 2022 2:35 PM IST

कोकण पट्ट्यात सोमवारी संध्याकाळच्या वेळीअचानक पावसाने हजेरी लावली.आलेल्या पावसानेशेतकरांच्या तोंडाशी आलेला घास हिरावून जाण्याची भीती येथील फळ बागायतदारामध्ये निर्माण झाली आहे. सोमवारी संध्याकाळी सहा वाजता अचानक पाऊस सुरू झाल्याने  मोहरातअसलेला आंबा पुन्हा खराब होण्याची शक्यता आहे.

या अवकाळी पावसाचा फटका हापूस आंब्याला मोठ्या प्रमाणात बसू शकतो. त्या सोबतच काजू देखील खराब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.पूर्वेकडील भागातून येत असलेल्या बाष्पयुक्त वाऱ्यांच्या प्रभावामुळे पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता.या अंदाजानुसार कोकण आणि गोव्यातील बहुतांशी भागात पावसाने हजेरी लावली आहे.

 मागील काही दिवसांपासून कोकणात वातावरणात अचानक बदल होत असून अवकाळी पाऊस,तसेच कडकडीत थंडी आणि ढगाळ वातावरणाची स्थिती पाहायला मिळत आहे.

मोहर आणि कणी सेटिंग च्या कालावधीत हापूसच्या कलमांना स्वच्छ वातावरणाची आवश्यकता असते. तरस हापूस आंब्याचे उत्पादन चांगले येते. परंतु यावर्षी स्वच्छ हवामान कमी झाल्याचे चित्र दरवेळी अनुभवायला मिळत आहे. तापमान जर 9 अंशापर्यंत घसरले तर पौष महिन्यात अनेक हापूसच्या कलमांना मोहोर आला आहे. झाडांच्या 99% टाळ्यांना मोहर फुटल्यामुळे पानेकमी मोहर अधिक अशी स्थिती बहुसंख्य हापूस बागांमध्ये दिसत आहे.यंदा हंगामाची सुरुवात होत असतानाच चांगली फूट झाली होती. बागायतदारांनी ऑक्टोबर महिन्यात फवारणी केल्यामुळे कणी सेटिंग हे चांगले होत होते.

परंतु वातावरणात अचानक बदल झाल्याने कणी गळून गेली. कोकणातील बहुतांश शेतकरी हे आंबा आणि काजू बागायतीवर आपला उदरनिर्वाह करतात. परंतु वातावरणामध्ये होत असलेल्या अचानक बदलामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. या कायमच्या वातावरण बदलामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत.

English Summary: fruit productive farmer worried about unseasonal rain and cloud situation
Published on: 19 January 2022, 02:35 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)