News

कोरोनामुळे अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला. यामुळे अनेक कुटुंब निराधार झाली. अनेक संसार उघड्यावर आले. कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती मोठ्या प्रमाणात खालावली गेली. अश्या परिस्थितीत अनेकांची मालमत्ता बॅंकांकडे तारण ठेऊन कर्ज घेतले. बॅंकांकडून हप्ते थकल्याने कर्जवसुलीसाठी तगादा लावला जात आहे. त्यामुळे राज्य सरकार त्या निराधारांना आता ठोस मदत करणार आहे.

Updated on 22 November, 2022 11:02 AM IST

कोरोनामुळे अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला. यामुळे अनेक कुटुंब निराधार झाली. अनेक संसार उघड्यावर आले. कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती मोठ्या प्रमाणात खालावली गेली. अश्या परिस्थितीत अनेकांची मालमत्ता बॅंकांकडे तारण ठेऊन कर्ज घेतले. बॅंकांकडून हप्ते थकल्याने कर्जवसुलीसाठी तगादा लावला जात आहे. त्यामुळे राज्य सरकार त्या निराधारांना आता ठोस मदत करणार आहे.

कोरोनामुळे दोन वर्षे सर्वसामान्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागला. घरातील कर्ता गेल्याने निराधार महिलेला कुटुंबाच्या उदरनिर्वाहासोबतच मुलांचे शिक्षण व मुलीच्या विवाहाची चिंता सतावू लागली आहे. बॅंकांकडून हप्ते थकल्याने कर्जवसुलीसाठी तगादा लावला जात आहे.

त्यामुळे राज्य सरकार त्या निराधारांना आता ठोस मदत करणार आहे. कर्ज भरण्याची परिस्थिती असलेल्यांना आर्थिक सवलत आणि कर्ज भरू न शकणाऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी होईल, असे विश्वसनिय सूत्रांनी सांगितले.

...तर सर्व ऊस वाहतूकदार व ट्रॅक्टर चालकांना दिला जाणार चोप! नगरमधील गावाची भन्नाट शक्कल

काही मयत कर्जदारांचे घर किंवा काही मालमत्ता जिल्हा मध्यवर्ती बॅंका, पतसंस्था व नागरी सहकारी बॅंकांकडे कर्जापोटी तारण आहे. या पार्श्वभूमीवर बॅंकांनी मंजूर केलेली रक्कम, तारण मालमत्ता, थकीत रक्कम व वसुलीची सद्यस्थिती काय,

यासंबंधीची माहिती तत्काळ सादर करण्याचे आदेश सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी सर्व जिल्हा बॅंका, नागरी सहकारी बॅंका, नागरी सहकारी पतसंस्थांना दिले आहेत. सर्व विभागीय सहनिबंधक (लेखापरीक्षण) व जिल्हा विशेष लेखा परीक्षकांना पण त्यासंबंधीच्या सूचना केल्या आहेत.

इलेक्ट्रिक कारचे स्वप्न पूर्ण होणार! फक्त ₹ 2000 मध्ये बुक करा कार; लुक, डिझाइन आणि फीचर्स खास

कोरोनापूर्वी जिल्हा बॅंका, नागरी सहकारी बॅंका व पतसंस्थांकडून कर्ज काढलेले अनेकजण कोरोनामुळे मयत झाले आहेत. त्यासंबंधीची माहिती सरकारने मागविली असून त्यासंबंधीचे आदेश बॅंकांना दिले आहेत. माहिती प्राप्त झाल्यावर सरकारला पाठवली जाणार असून त्यावर अंतिम निर्णय मंत्रिमंडळात होईल.

LPG गॅस सिलेंडरवर 50 लाखांचा विमा मिळतो; तुम्हाला क्लेमची प्रक्रिया माहित आहे का?

English Summary: Farmers will get loan waiver; Big decision of the state government
Published on: 22 November 2022, 11:02 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)