News

शेतकरी आपल्या जीवाचे रान करत शेतात पेरलेले पीक उभे करतो. मात्र, कधी नैसर्गिक तर कधी वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतकरी हतबल झाल्याचे अनेकदा दिसून येतं. मात्र अमरावती जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने पिकांची नासाडी करणाऱ्या जंगली डुकरांपासून पीक वाचवलं आहे. त्यासाठी शेतकऱ्यानं चक्क भन्नाट कल्पना प्रत्यक्षात आणली आहे.

Updated on 26 November, 2022 1:20 PM IST

शेतकरी आपल्या जीवाचे रान करत शेतात पेरलेले पीक उभे करतो. मात्र, कधी नैसर्गिक तर कधी वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतकरी हतबल झाल्याचे अनेकदा दिसून येतं. मात्र अमरावती जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने पिकांची नासाडी करणाऱ्या जंगली डुकरांपासून पीक वाचवलं आहे. त्यासाठी शेतकऱ्यानं चक्क भन्नाट कल्पना प्रत्यक्षात आणली आहे.

चांदुर बाजार तालुक्यातील शिरसगाव बंड येथील शेतकरी मनोज निंभोरकर यांनी आपल्या शेतात दोन वर्षांपासून रानडुकरापासून हरभरा बियाण्याचा बचाव करण्याची नवीन शक्कल लढवली. या शेतकऱ्याने पेरणीपूर्वी आपल्या हरभरा बियाण्यावर अंघोळीला वापरण्यात येणारे शाम्पू लावून ते उन्हात वाळविले.

त्यानंतर त्या बियाण्यावर कीड प्रतिबंधक औषधी व रसायने लावून शेतात पेरणी केली. रानडुकरांनी शेतात शिरून बियाणे खाण्याचा प्रयत्न केला असता, शाम्पूमुळे त्यांच्या तोंडात फेस होतो. यामुळे कन्फ्यूज झालेले रानडुकर शेत सोडून पळू लागले. हा यशस्वी प्रयोग त्यांनी गतवर्षी सर्वप्रथम केल्याने त्यांचे इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत नगण्य नुकसान झाले.

यावर्षीसुद्धा त्यांनी हाच प्रयोग आपल्या हरभरा पेरणीच्या वेळी केल्यामुळे अद्याप त्यांच्या हरभरा बियाण्याचे शेतात नुकसान झाले नसल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, इतर शेतकऱ्यांना मात्र रानडुकरांपासून बियाणे नुकसानीचा मोठा फटका बसला आहे.

राष्ट्रीय दूध दिवस 26 नोव्हेंबरलाच का साजरा केला जातो? जाणून घ्या त्यामागील रंजक कथा

शेतकऱ्यांनी हा प्रयोग केल्यास शेतात होणाऱ्या हरभरा बियाण्याच्या नुकसानापासून बचाव होऊ शकतो, असा ठाम विश्वास मनोज निंभोरकर यांनी दर्शविला असून त्यांनी शेतकऱ्याना हा वापरण्याचे आवाहन केले आहे.

आता या लोकांना मिळणार मासिक ३ हजार रुपये पेन्शन! वाचा सर्व तपशील

English Summary: Farmers came up with a unique idea to drive away wild boars
Published on: 26 November 2022, 01:20 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)